Train Airways
Train Airways 
मुंबई

कोरोनाची अशीही धास्ती; मुंबईहून येणाऱ्या रेल्वे, विमाने आमच्याकडे पाठवू नका...

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून इतर भागात जाणाऱ्या लोकांमुळे त्या भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या रेल्वे तसेच विमाने आमच्या राज्यात पाठवू नका, असे पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारला कळवले आहे. अर्थातच विमानसेवा दोन आठवड्यासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे, तर ट्रेनची संख्या कमी करण्यात आली आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, दिल्ली, अहमदाबादहून कोलकत्त्यात विमानांची सेवा नको, असे पश्चिम बंगाल सरकारने केंद्रीय उड्डाण मंत्रालयास कळवले होते. त्यांनी या शहरांसह सूरत तसेच इंदूरहून कोलकत्त्यास जाणारी विमानसेवा 19 जुलैपर्यंत थांबवण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली तसेच तमिळनाडूतून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना रुग्णात वाढ होत असल्याचा पश्चिम बंगाल सरकारचा दावा आहे. कोलकत्ताप्रमाणेच बागदोरा (सिलीगुडी) आणि आंदाल (दुर्गापूर) या पश्चिम बंगालमधील अन्य ठिकाणीही विमानांची सेवा मुंबई, दिल्लीसह अन्य शहरातून नको असेही सांगितले आहे. 

लॉकडाऊनपूर्वी कोलकता विमानतळावरुन दररोज दोनशे विमानांचे उड्डाण होत असे. देशातील विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय कोलकत्त्यातून 65 विमानांचे उड्डाण होईल, असे सांगितले होते. आता त्यात घट झाली आहे. पश्चिम बंगालला महाराष्ट्रातून येणारी विमानेच नको तर रेल्वेही बंद करण्याची सूचना केली आहे. 

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते हावडा मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्याची सूचना केली आहे. ही ट्रेन सध्या रोज धावत आहे, मात्र पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीमुळे ती आता आठवड्यातून एकदाच असेल. अर्थातच तिकीटांचा परतावा लगेच सुरु करण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या ट्रेनना विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. श्रमिक स्पेशल सुरु झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या ट्रेनना परवानगी नाकारली होती. त्यांनी श्रमिक स्पेशलची कोरोना एक्सप्रेस म्हणून हेटाळणीही केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT