file photo 
मुंबई

कोरोनाबाबत सरकारच्या धोरणांची थट्टा नको 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना साथीचा धोका देशभर असताना सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका करणाऱ्या पुण्यातील व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. देशावर ओढवलेल्या संकटाची आणि आजच्या परिस्थितीची थट्टा करु नये, असे खडे बोल त्याला न्यायालयाने सुनावले. 

केद्र सरकारने कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामधून जीवनावश्‍यक वस्तूंच्या शिवाय अन्य वस्तू विक्रीला मनाई केली आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले आहे. मात्र या सुरक्षा निर्देशांविरोधात पुण्यातील व्यावसायिक सिद्धार्थ भगत यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सर्व नागरिक नियमांचे पालन करीत आहेत, अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध आहेत, आपत्कालीन व्यवस्था काम करत आहे, मग लॉकडाऊनची आवश्‍यकता काय आहे, पोलिस अकारण जबरदस्तीने आणि मारहाण करून दुकाने बंद करीत आहेत, आणि विनाकारण जमावबंदी लागू करीत आहेत, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. 

याचिकेवर न्या. अनंत बदर यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. सद्य स्थितीमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. अशावेळी सरकारच्या सार्वजनिक धोरणांविरोधात याचिका करणे आणि त्याची थट्टा करणे अयोग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याचिकादाराला दंड ठोठावण्याचे संकेतही न्यायालयाने दिले होते. मात्र त्याचा स्वतः चा मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे आणि लॉकडाऊनमुळे आधीच नुकसान होत आहे, असे त्याच्या वतीने विनवण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने नरमाई दाखवत याचिकादाराला समज दिली. याचिकादाराला दंड सुनावण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली होती. 

हेही वाचा... प्राण्यांनाही होतोय कोरोना 
 
याचिका फेटाळली 
प्रवासाला मनाई असूनही याचिकादार व्यावसायिक पुणे- मुंबई प्रवास दुचाकीवरून करून आला होता. सरकारने लॉकडाऊन लवकर जाहीर केला. त्यामुळे नुकसान झाले आणि संसर्ग वाढला असा आरोप त्याने केला होता. मात्र न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT