कामगारांचे आरोग्य धोक्‍यात  
मुंबई

बेस्ट कामगारांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः बेस्ट उपक्रमावरील आर्थिक संकटामुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ताणतणावामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात १६५ कामगारांचे निधन झाले; तर २०१९-२० मध्ये आतापर्यंत २३० कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्याचे पडसाद नुकत्याच झालेल्या बेस्ट समितीत उमटले. कामगारांच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनावर ठपका ठेवत ५० वर्षांत पहिल्यांदाच बेस्ट समितीची सभा तहकूब करण्यात आली.

बेस्ट उपक्रमाच्या दिंडोशी आगाराचे बसचालक बाबारामू आलदर यांना कामावर असतानाच हृदयविकाराचा झटका आला; परंतु व्यवस्थापनाने त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात न नेता आगारापासून दूर असलेल्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ बेस्ट समितीचे काँग्रेस सदस्य भूषण पाटील यांनी झटपट तहकुबी सूचना मांडली. बेस्टवरील आर्थिक संकट आणि प्रशासनाच्या धोरणांचा कामगारांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे, असे ते म्हणाले. 

करारावर सही न केल्यामुळे ५० टक्के कामगारांना वाढीव पगार मिळालेला नाही. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागांवर नवीन भरती केलेली नाही. ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्याची शक्‍यता नाही. २०१९ मधील जाचक ‘ड्यूटी शेड्युल’ बदललेले नाही. त्यामुळे अनेकांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. असा प्रसंग ओढवल्यास संबंधिताला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याऐवजी, उपचाराचे पैसे कोण देणार, असा जाब प्रशासन विचारेल या भीतीने महापालिका किंवा सरकारी रुग्णालयात दाखल केले जाते, असे पाटील यांनी निदर्शनाला आणून दिले. तर, बेस्ट उपक्रमाचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी कामगारांचे आजार, मृत्यू आदी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT