मुंबई

27 गावांच्या स्वतंत्र पालिकेसाठी दोन महिन्यांचा अवधी 

रवींद्र खरात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळण्याबाबत मंत्रालयात शुक्रवारी (ता. 14) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. 27 गावे पालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे. दरम्यान, केडीएमसीची निवडणूक ऑक्‍टोबर 2020 मध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वी सहा महिने आगोदर म्हणजे एप्रिल महिनाअखेरपर्यंत नगरपालिकेबाबत निर्णय न घेतल्यास पालिकेच्या निवडणुका 27 गावांसह घेण्याची नामुष्की ओढवणार आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक ऑक्‍टोबर 2020 मध्ये होणार आहे. 2011 च्या लोकसंख्येचा आधार घेऊन मतदार यादी आणि प्रभाग निश्‍चित करण्यात येणार आहे. 2015 च्या पालिका निवडणुकीपूर्वी 27 गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये आल्याने हद्द आणि प्रभाग संख्याही वाढली. अनुसूचित जाती-जमातीच्या एकूण लोकसंख्येनुसार चक्राकार आरक्षणावर प्रभाग ठरतात.

पालिकेत 27 गावे समाविष्ट झाल्याने बहुतांश आरक्षण 27 गावांतील प्रभागांमध्ये पडले होते. त्यात आता 27 गावे पुन्हा वगळल्यास सर्व आरक्षण पुन्हा पालिका हद्दीतील प्रभागांमध्ये पडणार असल्याने इच्छुकांची धास्ती वाढणार आहे. 2015 च्या निवडणुकीमध्ये मूळ 107 प्रभागांचे 101 प्रभाग झाले होते; तर 27 गावांचा समावेश झाल्याने तेथील 21 प्रभाग पाहता एकूण 122 प्रभाग झाले होते. आता पुन्हा सरकारने 27 गावे पालिका हद्दीतून वगळल्यास पालिकेच्या प्रभागरचनेत बदल होणार असून सरासरी लोकसंख्या पाहता 112 ते 115 प्रभाग निर्मिती होण्याची शक्‍यता आहे. 

मात्र 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय निवडणुकीच्या सहा महिने आगोदर म्हणजेच एप्रिल महिन्यातच घ्यावा लागणार आहे. मंत्रालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असली, तरी मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT