मुंबई

मुंबईतील कोळीवाड्यांच्या सिमांकनात मोकळ्या जागा वगळल्या; मासळी सुकायचे भुखंड गावा बाहेर

समीर सुर्वे


मुंबई : मुंबई महानगर पालिकेने शहरातील 13 कोळीवाड्याच्या सुधारीत सिमांकन निश्‍चित करुन त्याचा मसुदा जाहीर केला आहे.मात्र, गावांच्या सिमांमधून मासळी सुकवण्याच्या बोटी लावण्याच्या जागा वगळण्यात आल्याचा आक्षेप ग्रामस्थांकडून घेतला जात आहे. मुंबई महानगर पालिकेच्या विकास आराखडा 2034 मध्ये कोळीवाडे आणि गावठाण्यांना विशेष दर्जा देण्यात असून त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे.या गावांमध्ये बैठकी,एक मजली घरी असली तरी ती झोपडपट्टांमध्ये गणली जात नाही.त्यांचा स्वतंत्र पणे विकास करता येतो.

सिमांकनावर कोळीवाड्यांमधून आक्षेप नोंदवला जात आहे."कोळीवाडा म्हणजे फक्त घरे नाहीत त्या परीसरात मासळी सुकवण्याची आणि बोटी लावण्याची मोकळी जागा असते.या जागा कोळीसमाजाने परंपरने जपल्या आहेत.त्याच जागा कोळीवाड्याच्या हद्दीत दाखविण्यात आलेल्या नाहीत असा आक्षेप कोळीमहासंघाचे सरचिटणी राजहंस टपके यांनी नमुद केले.वर्सोवा कोळीवाड्यातील स्मशाणाची जागा ही गावा बाहेर दाखविण्यात आली आहे.मुळात परंपरेनुसार स्मशाण हे गावाच्या वेशीवर असते.त्यामुळे ही जागा गावाचीच आहे.या जागा गावात न दाखवल्याने त्यांच्या गावाची मालकी राहाणार नाही.भविष्यात येथे कोणताही प्रकल्प राबवला जाईल.त्यावर ग्रामस्थ कोणताही आक्षेपही घेऊ शकत नाही.त्याच परीणाम थेट व्यवसायावर होणार असल्याने या बाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.तसेच,महानगर पालिकेकडे याबाबत आक्षेपही नोंदविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.तर,गावठाणाच्या हक्कांसाठी काम करणारे गॉडफ्री पिमेंटो यांनीही जुहू कोळीवाड्याची जागा गावा बाहेर दाखवली असल्याची सांगितले.सर्वच ठिकाणी ही समस्या असून त्यासाठी स्थानिक कोळीवाड्यांकडूनही आक्षेप नोंदवला आहे.असेही गॉडफ्री यांनी सांगितले.

महानगर पालिकेने 2018 मध्ये मंजूर केलेल्या विकास आराखड्यात 52 गावठाणे आणि 26 कोळीवाड्यांचे सिमांकन निश्‍चित केले होते.त्यानंतर आता 13 कोळीवाड्यांचे सुधारीत सिमांकन करुन त्यांचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे.यावर 30 ऑक्‍टोबर पर्यंत सुचना व हरकती मागवविण्यात आल्या आहेत.मुंबईत 189 गावठाणे आणि 42 कोळीवाडे आहेत.

हद्दी निश्‍चिती कशासाठी
-कोळीवाडे,गावठाणे हे झोपडपट्ट्या नसुन त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र नियमावली आहे.तसेच,काही गावठाणे आणि कोळीवाड्यांना हेरीटेज दर्जाही आहे.गावांमधील अनेक घरे वैशिष्ट पुर्ण आहे.हद्दी निश्‍चित झाल्यास भविष्यात गावांच्या हद्दीवरुन वाद होणार नाही.

या कोळीवाड्यांच्या सिमांकनात सुधारणा
मनोरी,भाटी,वझीरा बोरीवली,वर्सोवा,मालवणी,चारकोप,गोराई,चिंबई वांद्रे,खारदांडा,मढ,जुहू,तुर्भे,माहुल

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT