चुकीला माफी नाही..! दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार 
मुंबई

चुकीला...माफी नाही! आर्थिक दंडासह दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार

दिनेश गोगी

उल्हासनगर : लॉकडाऊन हे 30 सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. बाजारपेठा, दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यासाठी पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी दुकानदार व नागरिक यांच्यासाठी कडक आदेश जाहीर केले आहेत. 

दोनदा आदेशाचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडाची वसूली व तिसरी चूक केल्यास दुकानदाराचे दुकान बंद तर मास्क टाळणाऱ्या नागरिकांवर एफआयआर असे आदेश डॉ. दयानिधी यांनी जारी केले आहेत. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी ही माहिती दिली.

उल्हासनगरात 9 हॉटस्पॉट होते.ते 2 वर आले आहेत. याठिकाणी पूर्वीसारखे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मॉल, बार, स्विमिंगपूल, सिनेमागृहे बंद ठेवली जाणार असून उर्वरित सर्व शहरातील बाजारपेठा, दुकाने, भाजीपाला हे सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानात सोशल डिस्टनिंग, सॅनिटायझर, हॅन्डवॉश बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, नागरिकांवर दक्षता समितीतील प्रमुख त्यांच्या टीमसोबत वॉच ठेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्थिक दंडासह एफआयआर
पालिका आयुक्तांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस 2 हजार रुपये, दुसऱ्या वेळेस 5 हजार रुपये दंड व तिसरी चूक केल्याचे दिसताच दुकान बंद केले जाणार आहे. तसेच नागरिक विनामास्क आढळतात पहिल्या वेळेस 500 रुपये, दुसऱ्या वेळेस 1 हजार रुपये दंड व तिसऱ्या चुकीला थेट स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर असे डॉ.राजा दयानिधी यांनी आदेशात म्हटले आहे. 
-----------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही, कसं तपासायचं? वाचा...

Nagraj Manjule : 'एका हयातीत शिवाजी महाराजांनी केलेलं काम एका चित्रपटात मांडणं अशक्य'; असं का म्हणाले दिग्दर्शक नागराज मंजुळे?

सायली-अर्जुन देणार गुडन्यूज? ठरलं तर मग मालिकेत भन्नाट ट्वीस्ट! बाळाच्या विचारात सायलीचं अर्जुनसाठी खास पत्र

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT