चुकीला माफी नाही..! दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार 
मुंबई

चुकीला...माफी नाही! आर्थिक दंडासह दुकान बंद तर नागरिकांवरही एफआयआर दाखल होणार

दिनेश गोगी

उल्हासनगर : लॉकडाऊन हे 30 सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. बाजारपेठा, दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यासाठी पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी दुकानदार व नागरिक यांच्यासाठी कडक आदेश जाहीर केले आहेत. 

दोनदा आदेशाचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडाची वसूली व तिसरी चूक केल्यास दुकानदाराचे दुकान बंद तर मास्क टाळणाऱ्या नागरिकांवर एफआयआर असे आदेश डॉ. दयानिधी यांनी जारी केले आहेत. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी ही माहिती दिली.

उल्हासनगरात 9 हॉटस्पॉट होते.ते 2 वर आले आहेत. याठिकाणी पूर्वीसारखे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मॉल, बार, स्विमिंगपूल, सिनेमागृहे बंद ठेवली जाणार असून उर्वरित सर्व शहरातील बाजारपेठा, दुकाने, भाजीपाला हे सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानात सोशल डिस्टनिंग, सॅनिटायझर, हॅन्डवॉश बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, नागरिकांवर दक्षता समितीतील प्रमुख त्यांच्या टीमसोबत वॉच ठेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्थिक दंडासह एफआयआर
पालिका आयुक्तांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस 2 हजार रुपये, दुसऱ्या वेळेस 5 हजार रुपये दंड व तिसरी चूक केल्याचे दिसताच दुकान बंद केले जाणार आहे. तसेच नागरिक विनामास्क आढळतात पहिल्या वेळेस 500 रुपये, दुसऱ्या वेळेस 1 हजार रुपये दंड व तिसऱ्या चुकीला थेट स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर असे डॉ.राजा दयानिधी यांनी आदेशात म्हटले आहे. 
-----------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT