मुंबई

अखेर पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला सुरवात, लवकरच पूल नागरिकांसाठी खुला होणार

रवींद्र खरात

कल्याण डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पत्रीपुलाचं अनेक दिवस रखडलेलं काम आजपासून सुरु झाले आहे. गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने आज सकाळी ९.५० मिनिटांपासून दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतलाय. दरम्यान दोन आठवड्यांमध्ये चार दिवसांच्या मेगाब्लॉकनंतर पत्रीपुलाच्या कामाला  खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. आज शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. 

पत्रीपुल हा नक्कीच मोठा प्रश्न आहे, रस्ते विकास महामंडळ हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने या कामांना वेग आला आहे. अशी विकास कामे राज्यात महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात येत असून एक दिवस राज्याला आम्ही पुढे नेऊ असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये केले. आज कल्याणमधील नवीन पत्रीपुल गर्डर लॉचिंग करण्याचे काम सुरू झाले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एम एस आर डी सी चे राधेश्याम मोपलवार आदींनी कामाची पाहणी केली.

मंत्री आदित्य ठाकरे असंही म्हणाले की, पत्रीपूल हा मोठा प्रश्न होता, मात्र तो आता मार्गी लागत असून अशी अनेक कामे राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत आहेत. प्रत्येक महिन्याला रखडलेल्या पुलाच्या कामाचा आढावा घेत असून पुढील काही वर्षात राज्याचे रूप बदलेल आणि आम्ही राज्याला पुढे नेऊ. प्रत्येक कामात सर्व जण राजकारण करतात, आम्ही फक्त निवडणुकांपुरतं राजकारण करतो बाकी वेळ विकास कामे करतो, असंही आदित्य  ठाकरे म्हणालेत. 

सोशल डिस्टंसिंगचा फज्जा 

पत्रीपुलाच्या कामाच्या वेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केले. आदित्य ठाकरे यांनी मंडपामध्ये येतात गर्दी पाहून दूर सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या .

जुना पत्रीपुल धोकादायक झाल्याने अचानक तोडण्यात आला, नवीन पत्रीपुल तयार करताना अनेक अडचणी आल्या. मात्र आता पुढील काही महिन्यात हा पूल नागरिकांना वाहतुकीला खुला करू असा दावा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केला आहे . नवीन  पत्रीपुल गर्डर लॉचिंग काम सुरू झाले असून ते कामाच्या पाहणीदरम्यान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ते म्हणालेत की, कुठले ही काम करताना नियोजन लागते मात्र जुना पत्रीपुल धोकादायक झाल्याने तो अचानक दोन वर्षपूर्वी पाडण्यात आला. नवीन पत्रीपुल आराखडा आणि बनविताना अनेक अडचणी आल्या. नागरिकांनाही त्रास झाला, मात्र या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आणखी महिन्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

girder work of patripool finally starts in kalyan bridge will be open in month for citizens  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!

Monsoon Beach Travel: पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जातंय? या गोष्टी लक्षात ठेवा

मोठा निर्णय : नीता अंबानीची टीम पुढील हंगामात नव्या नावासह मैदानात उतरणार, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी...

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Daulat Sugar Factory Auction : दौलत साखर कारखान्याची होणार विक्री, ‘एनसीडीसी’कडून लिलावाची नोटीस; ९ ऑक्टोबरला ई-लिलाव

SCROLL FOR NEXT