मुंबई

मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईसाठीची आणि महाराष्ट्रासाठीची अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी मुंबईतून समोर येतेय. मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयात १२ रुग्णांच्या दुसऱ्यांदा कराव्या लागणाऱ्या कोरोना टेस्ट या निगेटिव्ह निघाल्या आहेत. याचाच अर्थ त्या १२ जणांना आता कोरोनाची लागण नसल्याचं स्पष्ट झालंय. टेस्ट निगेटिव्ह आल्याने आता कस्तुरबा रुग्णालयातील हे १२ नागरिक आता कोरोना मुक्त झालेत. कस्तुरबा रुग्णालयात हे १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले होते. दरम्यान आज त्यांची दुसऱ्यांदा करावी लागणारे टेस्ट आज पार पडली आणि या टेस्टमध्ये हे १२ नागरिक निगेटिव्ह झालेत. 

दिलासा मिळाला पण काळजी हवीच 

आज ज्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यात अशाना काळजी घेण्यासाठी सांगण्यात आलाय. या १२ नागरिकांना यापुढील १४ दिवस स्वतःला आयसोलेशन म्हणजेच विलगीकरणात ठेवावं लागणार आहे. स्वतःला इतरांच्या संपर्कात येऊ नका हे सांगण्यात आलंय. त्यामुळे दिलासा जरी मिळाला असला तरीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. 

यापूर्वी पुणे आणि औरंगाबादेतून दुसऱ्यांदा करण्यात येणाऱ्या चाचण्या निगेटिव्ह येत होत्या. दरम्यान आता मुंबईमधून देखील ही दिलासादायक बातमी समोर येतेय. जरी पुढील १४ दिवस या सर्वांना क्वारंटाईनमध्ये राहण्यासाठी सांगण्यात आलं असलं तरीही आज समोर आलेली ही बातमी महाराष्ट्रासाठी गुड न्यूजच आहे. 

good news from mumbai twelve citizens detected negative from mumbai kasturba 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT