मुंबई

राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीवर भगतसिंह कोश्यारी यांचं अजूनही मौन, सरकार उचलणार मोठं पाऊल ?

सुमित बागुल

मुंबई : विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अजूनही भगतसिंह कोश्यारी यांच्या कोर्टात आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 6 नोव्हेंबर रोजी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नेमणुकीसाठीची यादी सुपूर्त करण्यात आली होती. 21 नोव्हेंबरपर्यंत ही यादी मंजूर करावी अशी विनंती राज्य सरकारकडून राज्यपालांना करण्यात आली होती. आज २१ तारीख आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या विनंतीची मुदत आज संपत आहे. अशात आज राज्यपाल कोश्यारी हे महाविकास आघाडी सरकारकडून आलेल्या यादीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

महाविकास आघाडी सरकारकडून निवडण्यात आलेल्या एकूण १२ नावांपैकी ८ नावांवर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांच्या नावांविरोधात याचिका केली गेलीये त्या आठ नावांमध्ये एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी हे देखील आहेत. सदर आठ नावे राजकारण्यांची आहेत, या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान नाही, असा दावा या याचिकेत करण्यात आलाआहे. या याचिकेवर येत्या २४ तारखेला मुंबई उच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे. 

दरम्यान, राज्यपालांकडून काही निर्णय घेतला गेला नाही तर राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत यावर पुन्हा चर्चा करून नवीन प्रस्ताव राज्यपालांना पाठवणार का ? किंवा राज्य सरकार कोर्टाचे दरवाजे ठोठवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. 

governor bhagatsingh koshyari yet to take decision on the list of governor appointed MLAs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajnath Singh statement : 'जर पाकिस्तान अजूनही डंपर आहे, तर ते त्यांचे...' ; राजनाथ सिंह यांनी लगावला टोला!

Atal Setu Toll Free: वाहनधारकांसाठी खुशखबर! 'या' वाहनांना अटल सेतूवर टोल टॅक्स नाही, महायुती सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Latest News Live Update : विटा शहरात डंपरने महिलेला चिरडले

अखेर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार, सुनीताने वांद्रे कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज; कोणकोणते आरोप केले?

Ganesh Chaturthi 2025 : 'या' गणेश चतुर्थीला एक-दोन नाही तर बनत आहेत 5 महायोग; या राशींवर बाप्पा होणार खुश

SCROLL FOR NEXT