Groundnut cultivation
Groundnut cultivation  
मुंबई

लहरी पावसामुळे भातपिकाला छेद, भिवंडीत प्रथमच भुईमुगाच्या शेतीचा प्रयोग 

शरद भसाळे

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात भाताचे पिक घेतले जाते. मान्सूनच्या पावसावर केली जाणारी ही शेती निसर्गाच्या लहरीपणामुळे आता अनिश्‍चित स्वरुपाची झाली आहे. त्यामुळे या पारंपरिक भातशेतीला छेद देत भिवंडीतील पहारे गावचे शेतकरी दीपक भोईर यांनी कृषी तज्ज्ञांकडून मातीची तपासणी करून घेत आपल्या दीड एकर हळव्या भातशेतीमध्ये प्रथमच भुईमुगाच्या शेतीचा प्रयोग केला आहे. 7 जून रोजी पेरणी केलेल्या भुईमुगाची झाडे बहरली असून ऑक्‍टोबर महिन्यात उत्पन्न हाती येण्याची अपेक्षा भोईर यांना आहे. 

भिवंडी तालुक्‍यात पाण्याच्या टंचाईमुळे बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. जास्त पाऊस पडल्यास ओला दुष्काळ, तर पावसाने ओढ दिल्यास कोरडा दुष्काळ, असा पाठ शिवणीचा खेळ सुरू असतो.

गेल्या तीन वर्षांपासून येथील शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडल्याने हातातोंडाशी आलेले हातचे भातपीक निघून जात आहे. त्यातच शेतमजूर मिळत नसल्यामुळे मोठी मेहनत करूनही येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारल्याने या काळात बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी सुद्धा झाले आहेत. 

अशा परिस्थितीत पहारे गावातील तरुण शेतकरी दीपक भोईर याने भुईमुगाच्या शेतीचा पहिला प्रयोग हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामसेवक गणेश जाधव यांचा सल्ला घेऊन कृषी प्रयोग केंद्रातून प्रथम मातीची तपासणी करून घेतली. त्यानंतर उच्च प्रतीचा भुईमूग लावला आहे.

सदरचे भुईमुगाचे पीक टवटवीत आले असून जमिनीखाली भरगच्च अशा शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. दीड एकर जमिनीमध्ये भुईमुगाची शेती लावली असून सुमारे 15 क्विंटल भुईमूग निघेल, अशी अपेक्षा दीपक यांना आहे. दरम्यान, तालुक्‍यातील भुईमुगाच्या शेतीचा पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातून भोईर यांचे कौतुक करण्यात येत आहे. 

दीड एकरासाठी 17 हजार खर्च 

  • भुईमुगाची पेरणी केल्यानंतर आतापर्यंत फक्त दोन वेळा खत देण्यात आले असून त्यामध्ये 50 किलो युरिया व 50 किलो जिप्सम देण्यात आल्याची माहिती दीपक भोईर यांनी दिली. आतापर्यंत दीड एकर भुईमुगाच्या शेतीसाठी 17 हजार रुपये खर्च आला असून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न दीपक यांना अपेक्षित आहे.
  • पिकाची उत्तम वाढ होत असल्याने संपूर्ण शेती हिरवीगार झाली आहे.या पिकाची विचारणा करण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी आवर्जून येत आहेत. यंदा पीक चांगले आल्यास पुढच्य वर्षीही शेतामध्ये भुईमुगाची पेरणी करणार, अशी मनोधारणा त्यांनी व्यक्त केली.  

----------

(संपादन ः प्रणीत पवार)

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT