high court. 
मुंबई

सेफ्टी किटशिवाय सफाई कामगारांची सुरक्षा कशी ? न्यायालयाचा महापालिकेला सवाल

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नवी मुंबईतील हजारो सफाई कामगार कोरोनाचा संसर्ग सुरू असताना सेफ्टी किटशिवाय काम कसे करतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला विचारला आहे.

कोरोनाचा धोका वाढत असताना आणि लॉकडाऊन सुरू असतानाही सफाई कामगार, कचरा वेचक कामावर हजर आहेत. त्यांना पीपीई किट पुरवणे बंधनकारक आहे. सेफ्टी किटशिवाय ते कसे काम करणार, अशी विचारणा न्या. एस. जे. काथावाला यांनी केली. नवी मुंबई क्षेत्रातील सफाई कामगार संघटने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. सेफ्टी किटमध्ये एन-95 मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदी साधनांचा अंतर्भाव असतो. या सेफ्टी किटच्या खरेदीचा तपशील आणि वापराची मुदत याबाबत लेखी माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले नवी मुंबई महापालिकेला दिले. 

कोरोनाची बाधा
नवी मुंबई महापालिकेने सुरक्षा साधने दिलेली नसतानाही हजारो कर्मचारी सफाईचे काम करत आहेत. आतापर्यंत काही जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 24 हून अधिक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते, असे याचिकादारांनी नमूद केले आहे.

How to protect cleaner worker without safety kits? read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT