मुंबई

"शिवसेनेने ठरवले तर भाजपला मुंबईत फिरणे अशक्‍य"

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेने ठरवले तर भाजप नेत्यांना मुंबईत फिरणेही अशक्‍य होईल, असा इशारा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिला. 

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्‍य होईल, असा थेट इशारा दिला.

आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू न करायला हे बापाचे राज्य आहे का, असे विधान केले होते. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्‍यता आहे. जयंत पाटील म्हणाले, भाजपने इतके घसरण्याची गरज नाही. मला वाटते त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. म्हणूनच भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली.

आपण कुणाचा बाप काढतो आहोत याचंही यांना भान राहिलेले नाही. ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणले तर यांना मुंबईत फिरणे देखील अशक्‍य होईल. मात्र, इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपने आत्मचिंतन करावे, असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.  

if shivsena decides bjp will not be able tome rome in mumbai says jayant patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT