atul amberkar 
मुंबई

पत्रकार अतुल आंबेरकर यांचं निधन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : वरिष्ठ पत्रकार अतुल आंबेरकर यांचं अकस्मात निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांचं निधन झालं असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून अतुल आंबेरकर हे एका मोठ्या मराठी वृत्तपत्रांमध्ये मुख्य उपसंपादकपदी कार्यरत होते. अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती. 

गोरेगावच्या सामना सोसायटीत ते राहत होते. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणेच त्यांनी वर्क फ्रॉम सुरु केलं. संध्याकाळपर्यंत रोजच्या कामबाबत त्यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधला. तसंच त्यांचं मॅसेजद्वारेही संभाषण सुरु होतं. मात्र त्यांनी रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक ढासळली. त्यांना तात्काळ जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. 

प्रस्थापित माध्यमांमध्ये काम करीत असताना, कोणत्या बातमीचं किती वजन आहे याचं त्यांना अचूक ज्ञान होतं. हेच त्यांच्या कामाबाबतचं प्रमुख वैशिष्टयं होतं. ऑटो सेक्टरमधील नवनवीन माहिती जाणून घेणं, त्यातल्याच नव्या ट्रेंडचा अभ्यास करणे हे त्यांच्या सर्वात आवडीचे विषय होते. या विषयांवर ते लिखाणही करायचे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयांवरील प्रासंगिक लिखाणही ते करायचे. 

आंबेरकर यांनी आपलं शालेय शिक्षण डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरात, तर कॉलेज शिक्षण पेंढारकर महाविद्यालयात पूर्ण केलं. अतुल हे 'सकाळ'चे वरिष्ठ उपसंपादक सुशील आंबेरकर यांचे बंधू होते.

Journalist Atul Amberkar passes away read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT