ठाणे : राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सतत पाठपुरावा करूनही कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या नाही. एकीकडे परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी तसेच परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे; मात्र कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेबाबत काहीच निर्णय होत नाही. यामुळे सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत असून, किमान गणेशोत्सवानंतर तरी चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे प्रमुख राजू कांबळे आणि सुजित लोंढे यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया राबवूनही 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. राज्य सरकारने एसटी बससेवा सुरू केली, तरी समन्वयाअभावी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू होऊ शकल्या नाहीत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करावी, यासाठी जून महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
मात्र कोकणी जनतेला न्याय देण्यासाठी राज्य सरकार सक्षम नसून केवळ नियमांचे कागदी घोडे नाचवून सरकारने अन्यायच केल्याची भावना कोकणवासीयांची झाली आहे. राज्य सरकारने वेळेत नियमावली बनवून रेल्वे प्रशासनाकडे पाठवली असती, तर अनेक चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाला जाऊ शकले असते; परंतु नियोजनशून्य कारभारामुळे चाकरमान्यांची निराशा झाली. तेव्हा आता कोकणातून परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.
'राज'दरबारात मांडणार समस्या
------------
(संपादन : प्रणीत पवार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.