मुंबई

पूरामुळे जेईई परीक्षा देऊ न शकलेल्या त्या विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंत सरसावले; म्हटले की 'काळजी करू नका...

तुषार सोनवणे

मुंबई - विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे, कोरोना काळातील कठीण दिवसांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे येथील नागरिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यातच पूरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट या परिक्षांना मुकावे लागले आहे. या विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचे विधान केले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी उदय सामंत यांनी याविषयावर संवाद साधला आहे.

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहरांमध्ये जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांची परिक्षा केेद्रे होती. सध्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळाधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक गावांचा शहरांशी थेट संपर्क तुटला आहे. काही विद्यार्थ्यांची घरे पुराच्या पाण्याने वेढली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचणे अडचणीचे ठरू शकते. ते परिक्षा देऊ शकत नाही. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय  राज्यमंत्री संजय धोत्रे यांना दिली आहे. त्याच्यांतील संवादानंतर, 'विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही' असा विश्वास सामंत यांनी दिला. 

दरम्यान, पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती बघता शैक्षणिक कार्यकर्ता नितेश बावनकर यांनी येथील विद्यार्थ्यांची जेईई पुढे ढकलण्यात यावी अशा आशयाची याचिका सोमवारी (ता.31) उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मागणी अमान्य करीत आजच परीक्षा घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. याशिवाय जे विद्यार्थी पूरपरिस्थितीमुळे जेईई देऊ शकले नाहीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे निर्देश देत, केंद्र आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. आता विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh : शेतकरी, कामगारांची आज देशव्यापी संपाची हाक, काय सुरू, काय बंद ? घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती

Shambhuraj Desai: सातारा झेडपीतील सत्तेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेच घेणार निर्णय: मंत्री शंभूराज देसाई, भाजप नेते गप्प नाहीत, काय म्हणाले?

लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत! राज्य सरकारने 35 महिन्यांत महामंडळाला दिले 5080 कोटी रुपये, 3 वर्षांत 171.60 कोटी महिलांचा सवलतीत प्रवास

मोठी बातमी! ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; ५ वर्षांतील नियमित कर्जदारांनाही लाभ; ‘या’ १४ जिल्ह्यांना मिळणार सर्वाधिक पैसे

Maha Shivratri Special: घरच्या घरी तयार करा चविष्ट मखाणा पंजिरी, रेसिपी आहे अगदी सोपी

SCROLL FOR NEXT