मुंबई

पूरामुळे जेईई परीक्षा देऊ न शकलेल्या त्या विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंत सरसावले; म्हटले की 'काळजी करू नका...

तुषार सोनवणे

मुंबई - विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे, कोरोना काळातील कठीण दिवसांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे येथील नागरिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. त्यातच पूरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट या परिक्षांना मुकावे लागले आहे. या विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचे विधान केले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी उदय सामंत यांनी याविषयावर संवाद साधला आहे.

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहरांमध्ये जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांची परिक्षा केेद्रे होती. सध्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळाधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक गावांचा शहरांशी थेट संपर्क तुटला आहे. काही विद्यार्थ्यांची घरे पुराच्या पाण्याने वेढली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचणे अडचणीचे ठरू शकते. ते परिक्षा देऊ शकत नाही. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय  राज्यमंत्री संजय धोत्रे यांना दिली आहे. त्याच्यांतील संवादानंतर, 'विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही' असा विश्वास सामंत यांनी दिला. 

दरम्यान, पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती बघता शैक्षणिक कार्यकर्ता नितेश बावनकर यांनी येथील विद्यार्थ्यांची जेईई पुढे ढकलण्यात यावी अशा आशयाची याचिका सोमवारी (ता.31) उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मागणी अमान्य करीत आजच परीक्षा घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. याशिवाय जे विद्यार्थी पूरपरिस्थितीमुळे जेईई देऊ शकले नाहीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे निर्देश देत, केंद्र आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. आता विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार मिळून काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT