मुंबई

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर केला 'हा' गंभीर आरोप 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आपल्या तडफदार भूमिका आणि घणाघाती टिकांसाठी कायम चर्चेत असतात.यंदाच्या विधानसभेत मनसेला खास काही यश प्राप्त झाले नसले तरी आपल्या नव्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे मनसे पुन्हा एकदाचर्चेत आली आहे. त्यातच डोंबिवली येथे निवडून आलेल्या मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटील यांनी ठाकरे सरकारवर डोंबिवली एमआयडीसीतील प्रकारांबाबत गंभीर आरोप केले आहेत. 

मागील काही दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसी परिसर हा तेथील गुलाबी रस्ता, भीषण आग इत्यादींमुळे चर्चेत आला आहे. त्यातच तेथे सुरु असलेल्या गटारांच्या कामादरम्यान एक संरक्षक भिंत पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट सरकारवरच टिका केली आहे. त्यांनी एमआयडीसी आणि कल्याण डोंबिवली महापालिका हे म्हणजे भ्रष्टाचाराचे नंदनवन झाले आहे, असेच थेट म्हटले आहे. एमआयडीसीत गटारांची सध्या सुमारे 29 कोटींची कामे चालू आहेत. याच एका कामांदरम्यान काल एक संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. यावर बोलताना आमदार राजू पाटील यांनी हि टिका केली. 

काय म्हणाले राजू पाटील 

एमआयडीसी आणि कल्याण डोंबिवली महापालिका हे भ्रष्टाचाराचे नंदनवन झाले आहे. या ठिकाणी कामे करण्यासाठी कत्रांटदारच जागेवर नाहीत. येथील कामांचे श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी केली पण टेंडर मात्र पालिका काढत नाही. अशा प्रकारची टिका राजू पाटील यांनी केली.  

web title : MNS MLA Raju Patil has made a serious allegation against the government

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ...तर राजकारण सोडून देईन, अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जंतरमंतरवरून आव्हान

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT