मुंबई

पावसामुळे ट्रेनमध्ये अडकलेल्या तब्बल २०० पेक्षा अधिकांची RPF आणि NDRF कडून सुटका

प्रशांत कांबळे

मुंबई : मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामूळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दरम्यान दुपारपासूनच मस्जिद रोड ते भायखळा दरम्यान रुळावर पाणी साचल्याने दोन लोकल ट्रेन अडकल्या होत्या दरम्यान, त्यातील सुमारे 200 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना CSMT आरपीएफ टीम, वाडीबंदर आरपीएफ टीम, NDRF आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर सुरक्षीत बाहेर काढण्यात आलंय. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमधून सुमारे 160 प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येत असलेली लोकलसुद्धा मस्जित बंदर येथे अडकली होती. दरम्यान त्यामधून सुमारे 75 प्रवाशांना बाहेर सुरक्षीत काढण्यात आले आहे. 

यामध्ये सिएसएमटी आरपीएस पोलिस निरीक्षक संदीप किरीटकर आणि वाडीबंदर आरपीएफ पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांची टीम आणि स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या टीमने ही कामगीरी बजावली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अडकलेल्या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरत्या निवाऱ्यात आता या प्रवाशांना सोडण्यात आले आल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

more than 200 local train travellers rescued from masjid railway station

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : बजेटआधी शेअर बाजार तापला! या आठवड्यात 5 नवे आयपीओ उघडणार; 'या' मोठ्या कंपनीची लिस्टिंग होणार

Philippines Ferry Accident : टायटॅनिक सारखी भीषण दुर्घटना ! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, १८ जणांचे मृतदेह हाती

Latest Marathi news Update : उत्तराखंड सरकारने समान नागरी संहिता (सुधारणा) अध्यादेश, २०२६' लागू केला

Indian Flag: प्रजासत्ताक दिनानंतर राष्ट्रध्वजाची सन्मानपूर्वक विल्हेवाट कशी लावावी? वाचा कायदा काय सांगतो

प्रजासत्ताक दिन 2026 विशेष: ‘बॅटल ऑफ गलवान’मधील ‘मातृभूमी’पासून सदाबहार देशप्रेम जागवणारी गीते

SCROLL FOR NEXT