NSG Photo Credit: SHIV KUMAR PUSHPAKAR
मुंबई

ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो: मुंबईला वाचवणाऱ्या NSG-मार्कोसची गोष्ट

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे NSG कमांडोंना पाचारण करण्यात आलं.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला (26/11 attack) आज १३ वर्ष पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्याच्या (Terror attack) आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. समुद्रमार्गे पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला होता. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला होता. अत्याधुनिक मशिन गन्स, ग्रेनेड्सनी सुसज्ज असलेल्या दहशतवाद्यांशी लढण्याचा मुंबई पोलिसांकडे अनुभव नव्हता. तरीही मुंबई पोलिसांनी आपल्यापरीने या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

NSG स्पेशल फोर्स

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे NSG कमांडोंना पाचारण करण्यात आलं. एनएसजी कमांडोजना 'ब्लॅक कॅट' कमांडोही म्हटलं जातं. NSG ही स्पेशल फोर्स आहे. सन १९८४ मध्ये एनएसजीची स्थापना करण्यात आली. अपहरण, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका या मध्ये एनएसजी कमांडो पारंगत असतात. भारतीय लष्कर, सीआरपीएफ, आयटीबीपी, आरएएफमधून एनएसजीसाठी निवड केली होती. एनएसजी कमांडो बनण्यासाठी ९० दिवसांच्या खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं.

कुठल्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कमांडोजना शारीरिक आणि मानसिक कणखरतेचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांशी सामना करताना कमांडोसमोर अनेक आव्हान होती. त्यांना जागेबद्दल फारशी माहिती नव्हती. ताज, ओबेरॉय ही खूप मोठी बहुमजली हॉटेल्स आहेत. अत्यंत कमी कालावधीत त्यांना दहशतवाद्यांशी दोन हात करायचे होते. हे एक चॅलेंज होतं.

२६/११ हल्ल्याच्यावेळी केलेल्या या ऑपरेशनला NSG ने 'ब्लॅक टॉरनॅडो' नाव दिलं होतं. घटनास्थळी ड्रॉप करण्याआधी तयारीसाठी फक्त ३० मिनिटं दिली होती. अजमल कसाब वगळता नऊ दहशतवाद्यांना एनएसजी कमांडोनी कंठस्नान घातलं. अखेर २८ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता ऑपरेशन 'ब्लॅक टॉरनॅडो' संपलं.

मार्कोस कमांडोज

मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हॉटेल ताज आणि ऑबेरायमध्ये सर्वप्रथम मार्कोस कमांडोजनी मोर्चा संभाळला होता. त्यांनीच या दहशतवाद्यांशी दोन हात केले. MARCOS ही नौदलाची स्पशेल कमांडो फोर्स आहे. सागरी युद्धात हे कमांडो पारंगत असतात. सन १९८७ मध्या मार्कोसची स्थापना झाली. समुद्र, हवा आणि जमीन अशा तिन्ही ठिकाणची ऑपरेशन्स पार पाडण्यात मार्कोस कमांडोज माहीर असतात. मार्कोससाठी भारतीय नौदलातून कमांडोजची निवड केली जाते. वयाच्या विशी-पंचविशीतील तरुण निवडले जातात. दहशतवादी हल्ला मोडून काढणं, अपहरण, समुद्री चाचे, घुसखोरांवर कारवाई अशा सगळ्या ऑपरेशन्समध्ये मार्कोस कमांडोज पारंगत असतात. अत्यंत खडतर प्रशिक्षणातून या कमांडोजना जावं लागतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT