NSG Photo Credit: SHIV KUMAR PUSHPAKAR
मुंबई

ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो: मुंबईला वाचवणाऱ्या NSG-मार्कोसची गोष्ट

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे NSG कमांडोंना पाचारण करण्यात आलं.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला (26/11 attack) आज १३ वर्ष पूर्ण झाली. या दहशतवादी हल्ल्याच्या (Terror attack) आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. समुद्रमार्गे पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला होता. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला होता. अत्याधुनिक मशिन गन्स, ग्रेनेड्सनी सुसज्ज असलेल्या दहशतवाद्यांशी लढण्याचा मुंबई पोलिसांकडे अनुभव नव्हता. तरीही मुंबई पोलिसांनी आपल्यापरीने या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

NSG स्पेशल फोर्स

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे NSG कमांडोंना पाचारण करण्यात आलं. एनएसजी कमांडोजना 'ब्लॅक कॅट' कमांडोही म्हटलं जातं. NSG ही स्पेशल फोर्स आहे. सन १९८४ मध्ये एनएसजीची स्थापना करण्यात आली. अपहरण, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका या मध्ये एनएसजी कमांडो पारंगत असतात. भारतीय लष्कर, सीआरपीएफ, आयटीबीपी, आरएएफमधून एनएसजीसाठी निवड केली होती. एनएसजी कमांडो बनण्यासाठी ९० दिवसांच्या खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं.

कुठल्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कमांडोजना शारीरिक आणि मानसिक कणखरतेचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांशी सामना करताना कमांडोसमोर अनेक आव्हान होती. त्यांना जागेबद्दल फारशी माहिती नव्हती. ताज, ओबेरॉय ही खूप मोठी बहुमजली हॉटेल्स आहेत. अत्यंत कमी कालावधीत त्यांना दहशतवाद्यांशी दोन हात करायचे होते. हे एक चॅलेंज होतं.

२६/११ हल्ल्याच्यावेळी केलेल्या या ऑपरेशनला NSG ने 'ब्लॅक टॉरनॅडो' नाव दिलं होतं. घटनास्थळी ड्रॉप करण्याआधी तयारीसाठी फक्त ३० मिनिटं दिली होती. अजमल कसाब वगळता नऊ दहशतवाद्यांना एनएसजी कमांडोनी कंठस्नान घातलं. अखेर २८ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता ऑपरेशन 'ब्लॅक टॉरनॅडो' संपलं.

मार्कोस कमांडोज

मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हॉटेल ताज आणि ऑबेरायमध्ये सर्वप्रथम मार्कोस कमांडोजनी मोर्चा संभाळला होता. त्यांनीच या दहशतवाद्यांशी दोन हात केले. MARCOS ही नौदलाची स्पशेल कमांडो फोर्स आहे. सागरी युद्धात हे कमांडो पारंगत असतात. सन १९८७ मध्या मार्कोसची स्थापना झाली. समुद्र, हवा आणि जमीन अशा तिन्ही ठिकाणची ऑपरेशन्स पार पाडण्यात मार्कोस कमांडोज माहीर असतात. मार्कोससाठी भारतीय नौदलातून कमांडोजची निवड केली जाते. वयाच्या विशी-पंचविशीतील तरुण निवडले जातात. दहशतवादी हल्ला मोडून काढणं, अपहरण, समुद्री चाचे, घुसखोरांवर कारवाई अशा सगळ्या ऑपरेशन्समध्ये मार्कोस कमांडोज पारंगत असतात. अत्यंत खडतर प्रशिक्षणातून या कमांडोजना जावं लागतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT