metro kadshed sakal
मुंबई

मुंबई: मेट्रो कारशेड आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे अखेर मागे

आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीसाठी झाडं तोडण्यास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीसाठी झाडं तोडण्यास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले. त्यामुळे 29 आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले असून पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मेट्रो कारशेडसाठी 4 ऑक्टोबर 2019 ला रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर कलम 353 अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे होते. गंभीर गुन्हे दाखल झाल्याने विद्यार्थ्यांना नोकरीस आणि पासपोर्ट काढण्यासाठी अडचणी येत होत्या.

महाविकास आघाडीचे सरकार येताच डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरे येथे होणाऱ्या कारशेडला स्थगिती देत आरे वाचवणार असल्याचे सांगितले. आरे वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवरील केसेस देखील मागे घेण्यात आल्याचे आदेश दिल्याचे ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आग्रही होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर अंमलबजावणीसाठी आंदोलकांना दीड वर्ष वाट पाहावी लागली.

आरेमध्ये वृक्ष तोडीच्या विरोधात आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी विनंती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रीमंडळातील इतर सदस्यांनीही आदित्य ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेच्या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याची कार्यवाही करावी असे आदेश गृह विभागाला दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आणि त्यानंतर आरेतील 29 जणांवर दाखल केले गुन्हे मागे घेऊन पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर पुढे अंमलबजावणी लांबली होती.

प्रतिक्रिया

अडीच वर्षे आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. आता सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने आम्हाला करियरवर लक्ष केंद्रित करता येणार आहे. -आदित्य पवार, आंदोलक

गुन्हे मागे घेतल्याने आम्हाला रिलीफ मिळाले आहे. आम्ही सर्वच अंदोलकांना त्रास सहन करावा लागत होता. सरकारने आपले आश्वासन पाळले यासाठी त्यांचे ही आभार. -श्रुती नायर, आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT