passenger flight 
मुंबई

कोरोना संसर्ग केवळ स्पर्शामुळेच होतो का ? उच्च न्यायालयाने केला महत्वपूर्ण सवाल...

सकाळवृत्तसेवा

मुंबई  : लॉकडाऊनमध्ये शिलिथता देत देशांतर्गत विमान वाहतूक सुरु झाली आहे. विमान प्रवासात प्रवाशांची सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे, महत्वाचे असताना विमानातील दोन आसनांमधील आसन रिक्त न ठेवण्याचा निर्णय केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाने घेतला होता.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विमानातील दोन आसनांमधील एक आसन रिक्त न ठेवण्याच्या केंद्र सरकार आणि एअर इंडियाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वैमानिक देवेन कनानी यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी आज न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. 

नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या वतीने प्रवासाबाबत घेण्यात येणाऱ्या सुरक्षा उपायांची माहिती खंडपीठाला देण्यात आली. स्पर्श टाळून दोन व्यक्तीमधील शारीरिक अंतर टाळता येते. तसेच प्रवाशांना सुरक्षित गाऊन आणि हातमोजे, मास्क असा पेहराव देण्यात येईल. ज्यामुळे स्पर्श किंवा अन्य प्रकारे ते सुरक्षित राहू शकतात, असा दावा नागरी उड्डाण मंत्रालयच्यावतीने करण्यात आला. विमान प्रवासातील सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेसंबंधित मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती केन्द्र सरकारने केली आहे. या समितीने सुचवलेल्या सुरक्षा तत्वांची माहिती खंडपीठाला देण्यात आली. समितीच्यामते मधल्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशाला विमानात प्रवेश करताना आणि बाहेर पडेपर्यंत सुरक्षेसाठी गाऊन दिला तर तो अनावश्यक स्पर्शापासून सुरक्षित राहू शकतो आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

नागरी उड्डयण मंत्रालय आणि तज्ज्ञ समितीने केलेल्या युक्तिवादावर बोलताना कोरोना बाधित व्यक्तीच्या केवळ स्पर्शानेच अन्य व्यक्ती कोरोना विषाणूने बाधित होऊ शकते का ? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. याबाबत शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने तज्ञ समितीला दिले आहेत.  विमानसेवेच्या सुरक्षेपेक्षा प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ३ महिन्यांच्या मुलीला गटारात फेकून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली आरोपी वडिलांना अटक

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT