मुंबई

व्यापाऱ्यांच्या गाळ्यांचा मालमत्ता कर APMC ने चूकवला, व्यापारी आणि संचालकांवर APMC मेहेरबान

सुजित गायकवाड

नवी मुंबई : भ्रष्टाचार आणि अनियमिततेने पोखरून खिळखिळ्या झालेल्या मुबई कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक व व्यापाऱ्यांवरही मेहेरबानी दाखवल्याचा ठपका वैधानिक लेखापरिक्षणात ठेवण्यात आला आहे. 2013-14 आणि 2014-15 या काळातील 22 संचालकांच्या नातेवाईकांनी वैयक्तिक कारणास्तव वाहने वापरल्याचे बाजार समितीचे सुमारे 10 लाख 72 हजार रूपये थकवल्याचा ठपका आहे. हे प्रकरण ताजे असताना बाजार समितीने व्यापाऱ्यांना विकलेल्या 23 दुकानांचा मालमत्ता करही पालिकेला अदा करून विशेष कृपादृष्टी दाखवली आहे.

बाजार समितीच्या दक्षता पथकाद्वारे काही वाहने भाडेतत्वावर घेण्यात येतात. त्याकरीता 16.67 पैसे या दराने वाहनधारकांना भाडे आकारण्यात येते. या वाहनांचा संचालकांच्या नातेवाईकांनी वैयक्तिक कामासाठी वापर केल्याचे वैधानिक लेखा परिक्षण समितीच्या निदर्शनास आले. 2013-14 च्या वर्षात 68 हजार 396 किलोमीटर व 2014-15 या वर्षात 24 हजार 552 किलोमीटर इतका वापर वैयक्तिक कारणास्तव केल्याचा ठपका आहे.

तत्कालीन संचालक मंडळावरील 22 संचालकांनी बाजार समितीचे 10 लाख 72 हजार 622 रूपये थकवले होते. सकाळने याबाबत एपीएमसीला विचारणा केल्यानंतर 22 पैकी 14 संचालकांनी व्याजासह पैसे भरले असून उर्वरीत 8 संचालकांकडून 4 लाख 82 हजार 954 रूपये थकबाकी असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले. बाजार समितीच्या वाहनांचा वैयक्तिक वापर संचालकांनी कशासाठी केला असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. असे असतानाच कृषी प्लाझा नावाने उभारलेल्या 23 गाळे 23 दुकाने या प्रकल्पातील सर्वच दुकानांचे मालमत्ता कर व्यापाऱ्यांनी न भरता बाजार समितीने भरल्याची धक्कादायक माहिती, माहितीच्या आधिकाराखाली उपलब्ध झाली आहे. ज्याचा मालमत्ता कर संबंधित व्यापाऱ्यांनी भरणे अपेक्षित असताना बाजार समितीने 2012 पासून 2018 पर्यंत तब्बल 44 कोटी 41 लाख 41 हजार 504 रूपयांचा मालमत्ता कर पालिकेला अदा केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

तुर्भे सेक्‍टर 15, येथे बाजार समितीने कृषी विषयक व्यापारासाठी 23 गाळे 23 दूकाने या प्रकल्पाच्या नावाखाली एक इमारत उभी केली. या इमारतीमधील सर्व गाळे हे शेतकऱ्यांना कृषी विषयक व्यापारासाठी विक्री करणे नियम आहे. मात्र हे सर्वच गाळे शेतकऱ्यांनी खरेदी केले नसून सर्वच व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचे समजते. तसेच यातील बहुतांश गाळे मार्केटमधील अधिकाऱ्यांचे असल्याची चर्चाही आहे. सद्या या इमारतींमधील गाळ्यात हार्डवेअर, हॉटेल, वीजेची उपकरणे, वीजेचे दिवे आणि कृषी विषयक सोडून इतर व्यावसायाशी निगडीत व्यावसाय सुरू आहे.

महत्त्वाच्या प्रतिक्रिया : 

वाहनांचा वापर केल्याबद्दल आकारण्यात आलेल्या रक्कमेपैकी 50 टक्के पेक्षा जास्त रक्कम संचालकांकडून वसूल केली आहे. उर्वरीत रकमा भरणा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 23 गाळ्यांची मालमत्ता वेगवेगळी त्यांच्या नावावर न झाल्यामुळे ते बाजार समितीशी जोडून आल्याने मालमत्ता कर पालिकेला भरण्यात आला होता. मात्र, आता ते पैसे आम्ही त्या गाळेधारकांकडून वसूल करीत आहोत. तसेच त्या गाळ्यांमध्ये कृषी विषयक कामे होत नसल्याने नोटीसा बजावल्या आहेत.
- अनिल चव्हाण, सचिव, बाजार समिती.

एपीएमसी मार्केटमधील घोटाळ्यामुळे 2014 ला उच्च न्यायालयाने सरकारला गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पण त्याकडे कोणी लक्ष केंद्रीत करीत नसल्याने बाजार समिती भ्रष्टाचाराचे कुराण झाले आहे. या बाजार समितीने माथाडी कामागारांचे पैसे थकवले आहेत. तसेच अधिकारी स्वतःच्या खिशातील वसूलीवर लक्ष ठेवत असल्याने उपकरावर परिणाम झाला आहे.
- नरेंद्र पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अध्यक्ष

mumbai news property tax and other taxes of shopkeepers paid by APMC special story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

Viral Video: दुकानात केळी पाहून छोट्या हत्तीला पडली भुरळ पण आईने तिथेच दिली चांगुलपणाची शिकवण, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश, तहसीलदाराचे निलंबन

AUS vs IND, 4th T20I: दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला, मग अभिषेक शर्मा बरसला; पण ऍडम झाम्पाला षटकारानंतर काटा काढला

T20I World Cup 2026: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आणखी एक वर्ल्ड कप फायनल; पाच शहरांमध्ये होणार सामने...

SCROLL FOR NEXT