RPF 
मुंबई

Mumbai : रेल्वे सुरक्षा दलाने १६ प्रवाशांचे प्राण वाचवले! पोलिसांच्या 'मिशन जीवन रक्षक"ची कामगिरी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात. मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" अंतर्गत गेल्या महिन्याभरात मध्य रेल्वेवर स्वतःचा जीव धोक्यात घालून १६ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

मध्य रेल्वेचा सुरक्षा दलाचे जवान केवळ रेल्वेच्या मालमत्तेचेच रक्षण करण्यासाठीच नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात आणि चोवीस तास जागरुक असतात.

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" चा एक भाग म्हणून मे महिन्यात अशा १६ प्रवाशांना मध्य रेल्वेवर वाचवण्यात आले आहे. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबई विभाग - ३

भुसावळ विभाग - ६

नागपूर विभाग - ६

सोलापूर विभाग - १

प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष

रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. आरपीएफ जवानाचे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर बारीक लक्ष ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Fifty: पोराने पुन्हा कमाल केली! वैभवची षटकार खेचून फिफ्टी... शमीला सलाम अन् प्रतिस्पर्धींना फोडला घाम

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : मुंबईत जायला सुरुवात करा, मराठा मुंबईत आल्याचं कोणाला समजलं समजलं नाही पाहिजे - मनोज जरांगे

SCROLL FOR NEXT