Debris sakal media
मुंबई

वडाळा-जीटीबी नगर रेल्वे स्थानकालगत कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाचा कानाडोळा

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे परिसरात (central-harbor railway) कचऱ्याचा ढीग (Debris near wadala-GTB station) साचून राहिला असून सुद्धा मध्य रेल्वे प्रशासनाचे (central railway ignorance) याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांकडून अस्वच्छ, गलिच्छ स्थानकांबाबत समाज माध्यमावरून, स्थानक व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार (Written complaint) केली जाते. वडाळा-जीटीबी नगर दरम्यान स्थानकालगत कचऱ्याचा ढीग साचला असून देखील त्याकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जातो.

देशात 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर देखील ' स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत', स्वच्छता पंधरवडा राबविला जातो. मात्र, असे असून देखील मध्य आणि हार्बर मार्गावरील स्थानक परिसर अस्वच्छ दिसून येत आहे. हार्बर मार्गावरील वडाळा-जीटीबी नगर रेल्वे स्थानकालगत रेल्वे रुळावर प्लास्टिक कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. प्लास्टिक च्या पिशव्या, थर्माकोलचे तुकडे, कागदांची रद्दीने रेल्वे रूळ झाकून गेले आहेत. वारंवार प्रकार करून देखील प्लास्टिक कचरा उचलला जात नसल्याने, कचऱ्याचा डोंगर तयार व्हायला आता वेळ लागणार नाही, अशी खोचक टीका प्रवाशांकडून केली जात आहे.

रेल्वे मार्गालगत मोठ्याप्रमाणात वस्ती उभी झाली आहे. या वस्तीचे अतिक्रमण रेल्वे रुळांशेजारी आले आहे. येथील रहिवाशांकडून या भागात कचरा फेकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेमधील प्रशासनाची रेल्वे स्थानक स्वच्छ करण्याची मनस्थिती असेल तर ते वडाळा-जीटीबी नगर येथील परिसर तत्काळ स्वच्छ करू शकतात, असे प्रवाशांनी सांगितले.

"स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. 2014 साली अनेक सेलेब्रिटी, राजकीय नेते, सामाजिक नेत्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला होता. मात्र, आता देशाच्या आर्थिक राजधानीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या लोकल परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. पालिका, रेल्वे यांनी एकमेकांकडे बोट दाखविण्यापेक्षा संयुक्तरित्या स्वच्छतेची कामे केली पाहिजेत. तर, रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी पुन्हा सेलेब्रिटीन स्वच्छता दूत बनून पुढाकार घेतला पाहिजे."

- धर्मेश बराई, संस्थापक, एन्व्हार्नमेंट लाईफ

धर्मेश बराई यांनी रेल्वे परिसर, रेल्वे रूळ अस्वच्छ आहे. येथील कचरा उचलून स्वच्छता केली पाहिजे, अशी लेखी तक्रार स्थानक व्यवस्थापकाकडे 2017 साली केली होती. मात्र तब्बल चार वर्षे झाली, तरी परिस्थिती जैसे-थे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT