बलात्कार प्रकरण sakal
मुंबई

बलात्कार प्रकरण : 21 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

4 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 33 जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. यातील 21 आरोपींची पोलीस कोठडी बुधवारी संपल्याने त्यांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. बचाव पक्षाच्या वकिलांनी संशयितांना न्यायालयीन कोठडी दिली जावी ही मागणी केली. मात्र ही घटना गंभीर आणि घृणास्पद असल्याचे सांगत जिल्हा न्यायाधीश एस.आर. पहाडे यांच्या न्यायलायाने अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे.

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना मागील आठवड्यात उघडकीस आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो अंतर्गत 33 जणांना ताब्यात घेतले आहे. यात 23 आरोपींना पोलिसांनी सर्व प्रथम ताब्यात घेतले होते. त्यातील 2 अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर उर्वरित 21 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती बुधवारी संपल्याने त्यांना बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालय हजर करण्यात आले. बचाव पक्षाकडून 7 ते 8 वकिलांनी बाजू मांडली. तर पीडित मुलीची बाजू सरकारी वकिलांनी मांडली.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही पुरावे गोळा केले आहेत, मात्र अधिक पुरावे गोळा करण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यासाठी पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. यावर हरकत घेत बचाव पक्षाच्या वकिलांनी सांशीयतांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी केली. मात्र सदर घटना ही गंभीर आणि घृणास्पद असल्याने पोलिसांना अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत वाढ करीत मुदत देऊ केली आहे.

- सुमारे अर्धा तास संशयितांची न्यायाधीशां समोर सुनावणी चालली.

- आरोपींना त्यांचे नाव आणि पोलिसांनी काही त्रास दिला का हे विचारण्यात आले.

- बचाव पक्षाच्या वकिलांनाही संशयितांना भेटू दिले जात नसल्याची सूत्रांची माहिती. यामुळे बचाव पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडायची कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- या घटनेत रिक्षा, मोबाईल व हुक्का यासारखे पुरावे पोलिसांनी गोळा केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र रिक्षा व्यतिरिक्त इतर वाहने यामध्ये असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

- या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून त्या तपासाठीही पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून मगितल्याची सूत्रांची माहिती.

- बचाव पक्षाचे वकील बाहेर येताच पालकांनी त्यांना एकच गराडा घालत काय झाले अशी विचारणा सूरु केली. तसेच मुलांना एकदा भेटू देणे, त्यांना कपडे व जेवण देता येईल का अशी विचारणा देखील पालकांनी केली. मात्र वकिलांनी पालकांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

- या प्रकणातील 5 आरोपींची गुरुवारी न्यायलायत सुनावणी होणार आहे. मात्र त्यांच्या पालकांनी आजच न्यायलयात गर्दी केली होती. त्यांनाही वकिलांनी तुमच्या मुलाची उद्या सुनावणी असल्याचे सांगत शांत रहाण्याचा सल्ला दिला.

- यामध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा संशय वारंवार व्यक्त केला जात असून बुधवारी राजकीय पक्षाचे काही कार्यकर्तेही न्यायालय आवारात उपस्थित होते.

मोठा पोलीस बंदोबस्त

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपींच्या नातेवाईकांनी दुपारी 12 वाजल्या पासूनच आवारात गर्दी केली होती. आरोपींना न्यायलयात आणताना पोलिसांनी आवारातील नातेवाईक, इतर केस मधील नागरिक सर्वांना एक तास बाहेर जाण्याची विनंती केली. नातेवाईक हटत नसल्याने अखेर पोलिसांनी सर्वांना जबरदस्ती बाहेर जाण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT