mumbai local file photo
मुंबई

लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे १,२७४ कोटींचे नुकसान

मुंबई लोकलमधून दररोज ८० लाख प्रवासी प्रवास करायचे.

दीनानाथ परब

मुंबई: लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटले जाते. कोरोनाची साथ येण्याआधी मुंबई लोकलमधून दररोज ८० लाख प्रवासी प्रवास करायचे. पण कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. मुंबई लोकलही बंद होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद आहे.

पहिली लाट ओसरल्यानंतर लोकल सुरु करण्यात आल्या होत्या. पण अजूनही पूर्ण क्षमतेने मुंबई लोकल सुरु झालेली नाही. लॉकडाउन, निर्बंध यामुळे मुंबईतील उपनगरीय लोकल वाहतुकीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे आतापर्यंत १,२७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. "कमी तिकिट दरांमुळे उपनगरीय लोकल सेवा नेहमीच तोट्यात राहिली आहे. लोकल पूर्णपणे बंद झाल्यामुळे उपनगरीय लोकलचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला. वर्ष २०२०-२१ मध्ये मध्य रेल्वेचे ६०० कोटी आणि पश्चिम रेल्वेचे ६७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले" असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

एक फेब्रुवारी २०२१ पासून महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु केली. पण त्याला वेळेची मर्यादा होती. सर्वसामान्यांना पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी सात पर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ नंतर प्रवासाची परवानगी होती.

मधल्यावेळेत अत्यावश्यक आणि सरकारी नोकरदारांना प्रवासाची मुभा होती. सर्वप्रथम अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जून २०२० पासून लोकल सुरु झाली. महाराष्ट्र सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत १५ एप्रिलपासून पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद केला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : ओबीसी समाज बांधवांची बैठक ठरली फिकी; रिकाम्या खुर्च्या ठळकपणे जाणवल्या

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT