Mumbai NEWS esakal
मुंबई

Mumbai : डांबराच्या चकचकीत रस्त्याची धुलाई

केडीएमसीतील धुळीने माखलेले रस्ते गबाळे

शर्मिाला वाळुंज

डोंबिवली : केडीएमसी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता पातळी सुधारण्यासाठी रस्त्यांची धुलाई केली जात असून धुळीने माखलेले मुख्य रस्ते मात्र गबाळे आहेत. केडीएमसी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता पातळी खालावली आहे. रस्त्यांवर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात दोन धूळ संयंत्र नियंत्रक खरेदी केलेले आहेत. मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता सुधारली नसून कल्याणमधील हवेचा निर्देशांक हा 123 च्या घरात आहे.

धूळ नियंत्रण करणारी ही संयंत्र नेमकी कोठे फिरतात हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ठाकुर्लीतील 90 फिट या डांबराच्या रस्त्यावर ते वारंवार फिरत असून शहरातील मुख्य खराब रस्ते, एमआयडीसी, ग्रामीण भागातील रस्ते अद्यापही धूळीने माखलेले असून जनतेचा पैसा पाण्यात जात असल्याची बोलले जात आहे.

कल्याण डोंबिवली शहराची हवेची गुणवत्ता पातळी ही गेल्या काही वर्षापासून खालावलेली आहे. शहरात सुरु असलेली बांधकामे, रस्त्यांची कामे या वायू प्रदुषणात आणखीनच भर घालत आहेत. डांबरी रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता प्रशासनाने पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी खडी, माती, सिमेंट मिश्रीत खडीचा भराव त्यात टाकला. परंतू पावसाने उघडीप देताच ही खडी रस्त्यावर पसरून वाहनांमुळे त्यातून धुरळा उडू लागला. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची सिमेंट कॉंक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत.

यामुळे देखील सिमेंट मातीचा धुरळा हवेत उडत असून त्याचा त्रास नागरिक गेले काही वर्षे सहन करत आहेत. वर्षानुवर्षे कल्याण डोंबिवलीकर धूळीचा त्रास सहन करत असताना अखेर पालिका प्रशासनास त्याची उपरती झाली आणि पालिकेने शहरातील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी कोटी रुपये खर्च करीत धूळ नियंत्रण संयत्र खरेदी करण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात घेतला. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्याची निविदा प्रक्रीया पूर्ण होत ही दोन संयत्र पालिकेच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात दाखल झाली आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी ही वाहने दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र मुख्य धुळीच्या रस्त्यांवर ही वाहने फिरकली देखील नसल्याची तक्रार नागरीक करतात. ठाकुर्ली येथील 90 फिट रोडवर सातत्याने ही वाहने फिरवली जात आहेत. हा रस्ता डांबराचा असून तो चकाचक असताना तो का पुन्हा स्वच्छ स्वच्छ केला जात आहे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर पालिकेचे कार्यालय आहे. त्यासोबतच येथे बडे गृहप्रकल्प असून त्यांना खूश ठेवण्यासाठी पालिका प्रशासन हे करीत असस्याची ओरड होत आहे. मानपाडा रोड, कल्याण शीळ रोड, एमआयडीसी परिसरातील रस्ते, कल्याण शीळ समांतर रोड, दिवा संदप रोड यांसारख्या अनेक रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून त्याठिकाणी एकदाही हे संयंत्र फिरकले नसल्याचे नागरिक सांगतात.

कल्याण मधील हवेचा निर्देशांक हा 5 डिसेंबरला 123 एवढा नोंदविला गेला आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर ही वाहने धूळ नियंत्रणाचे काम करतील. वाहनांमुळे धूळ उडू लागली की ही वाहने प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फवारा हवेत मारुन उडणारी धूळ जमिनीवर बसविण्याचे अथवा धुळीला आहे त्या ठिकाणीच बसविण्याचे काम करणार आहेत. असे असताना ज्या भागात धूळ आहे त्याठिकाणी हे संयंत्र फिरवणे आवश्यक असताना ते का फिरवले जात नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कल्याण व डोंबिवलीसाठी प्रत्येकी एक वाहन आहे. प्रत्येक प्रभागासाठी त्यांना दिवस ठरवून देण्यात आले असून त्याचे नियोजन स्वच्छता अधिकारी व प्रभाग अधिकारी यांच्याकडून केले जाते.

- अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT