Water-Storage
Water-Storage 
मुंबई

३०० दिवस पुरेल इतका पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. महिनाभरातील पावसामुळे सर्व तलावांत एकूण ७८.०८ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे ३०० दिवस पुरेल, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.

जूनच्या अखेरीला विश्रांती घेतलेल्या पावसाने काही दिवसांपासून तलावांच्या क्षेत्रात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे महिनाभरातच तलावांतील पाणीसाठा ७८.०८ टक्‍क्‍यांवर गेला आहे. मुंबईकरांची वर्षभर तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. सध्याचा जलसाठा ध्यानात घेतल्यास आणखी तीन लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास काही दिवसांत मुंबईकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होऊ शकेल, असा विश्‍वास महापालिकेच्या जल अभियंता विभागाने व्यक्त केला. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी, तानसा आणि मोडक सागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT