मुंबई

मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला, केवळ 'इतके' टक्केच जलसाठा कमी

पूजा विचारे

मुंबईः ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत.  सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. २४ ऑगस्टला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात   ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, तलाव क्षेत्रात आतापर्यंत  ९४.९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. आता तलाव क्षेत्रात फक्त ५ टक्के जलसाठा कमी आहे.

मुंबईला ७ तलावांतून पाणीपुरवठा केला जात असून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळं तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहू लागलेत.

यंदा पावसानं जून आणि जुलै महिन्यात पुरेशी हजेरी न लावल्यानं मुंबईकरांवर पाणी संकट आलं. मात्र ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली.  त्यानंतर तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं गेल्या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये तलाव भरलेत.

वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ ऑक्टोबरला १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणं अपेक्षित आहे. सध्या १३ लाख ७३ हजार जलसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात तलावांमध्ये ९६ टक्के जलसाठा होता.

अनेक दिवसांपासून पावसाची संततधारा सुरू असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे.  यामुळेच मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. जून,जुलै महिन्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे मुंबईत ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली होती.ऑगस्ट मध्ये झालेल्या दमदार पावसामुळे २१ ऑगस्ट पासून ही पाणी कपात १० टक्‍क्‍यांवर आणण्यात आली.  ही उर्वरित १० टक्के पाणीकपातही रद्द होणार शक्यता आहे.

Mumbai Water storage 7 lakes need five percent water

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT