Corona Vaccination Sakal media
मुंबई

नवी मुंबईत ५२ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसकवच

एक मात्रा घेतलेल्यांची नोंद ६० टक्के

सकाळ वृत्तसेवा

वाशी : कोरोना लसीकरणाला (corona vaccination) सुरुवात झाल्यानंतर आरोग्य सेवकांनंतर प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना (senior citizen vaccination) लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र अद्याप त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. नवी मुंबईत दोन्ही मात्रा घेतलेल्या (two dose) ज्येष्ठ नागरिकांची संख्या ५२ टक्के आहे. तर एक मात्रा (first dose) घेतलेल्यांची संख्या ६० टक्केपर्यंत गेली आहे.

कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या रुग्णांना अधिक असल्याचे आतापर्यंतच्या प्रादुर्भावावरून स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत १,९२९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १,०७६ मृत्यू हे ज्येष्ठांचे झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना लस देणे सुरू करण्यात आले होते.

नवी मुंबई एकूण लसीकरणपात्र नागरिकांची संख्या १० लाख ८० हजार असून त्यात दीड लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ९१ हजार ३७३ जणांना पहिली मात्रा तर ७९ हजार ४१६ जणांना दोन्ही लसमात्रा आतापर्यंत मिळालेल्या आहेत. म्हणजे पहिली मात्रा ही ६० टक्के तर दोन्ही मात्रा घेतलेल्यांची टक्केवारीही ५२ टक्के आहे.

ज्येष्ठांच्या मृत्यू
६१ ते ७० : ५७०
७१ ते ८० : ३७४
८१ ते ९० : १३९
९१ ते १०० : १५

शहरातील ज्‍येष्‍ठांची संख्या - १.५० लाख
दोन्ही डोस - ७९ हजार ४१६
पहिला डोस - ९१ हजार ३७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT