मुंबई

राज्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्राकडून केलं जातंय, त्यांच्या कृतीतून ते दिसतंय - सुप्रिया सुळे

सुमित बागुल

मुंबई : मेट्रो कारशेडचा वाद चांगलाच चिघळताना पाहायला मिळतोय. कारण मुंबईतील मेट्रो ३ चं कारशेड आरेतून कांजूरच्या जागेवर हलवण्यात आल्यानंतर आता त्या जागेवर केंद्राने स्वतःचा मलाही हक्क दाखवलाय. सदर जागा मिठागराची असल्याने ती केंद्राच्या अखत्यारीतील आहे आणि त्या जागेवर कुणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा रीतसर बोर्ड केंद्राकडून लावण्यात आला आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मेट्रो तीनचं प्रस्तावित कारशेड ज्या कांजूरच्या जागेवर होणार आहे ती कांजूरमार्गची जागा राज्याच्याच मालकीचीच असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. केंद्राकडून राज्याचे सर्व अधिकार काढून घेतले जात असल्याची टीका देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलीये.

खासदार सुप्रिया सुळे याबाबत बोलताना म्हणाल्यात की, "केंद्राकडून धक्कादायक गोष्ट समजली आहे. सर्वात आधी ती जमीन महाराष्ट्राची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची ती जमीन असते त्यांचाच त्याच्यावर पहिला अधिकार असतो. त्यातूनही केंद्राने काहीतरी नवीन शोधून काढलं आहे. राज्यांचे सर्व अधिकार सातत्याने काढून घेण्याचं पाप केंद्र सरकारकडून केलं जातंय आणि त्यांच्या कृतीतून ते दिसतंय देखील. सदर बाब दुर्दैवी असून महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक आहे", असं  देखील सुप्रिया सुळे म्हणाल्यात म्हणाल्या आहेत. 

NCP mp supriya sule on claim by center on the land of propesed kanjur land for metro carshed 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT