मुंबई

आंतरजातीय विवाह योजनेचा मार्ग खडतर 

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : भेदभाव दूर करण्यासाठी असलेल्या "आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजने'साठी केंद्र सरकारने दोन वर्षांपासून 50 टक्के निधी दिला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 300 पेक्षा अधिक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला नाही. 

भेदभाव मिटवण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साह देण्यात येते. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2010 पासून आंतरजातीय विवाहांसाठीचे 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून देण्यात येत होते. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार 50-50 टक्के निधी देते. परंतु दोन वर्षांत केंद्राकडून यासाठी निधी देण्यात आला नाही. त्यामुळे राज्याकडून निधी मिळाल्यानंतरही लाभार्थींना अर्थसाह्य देता आले नाही. दोन वर्षांत 300 पेक्षा अधिक लाभार्थी अर्थसाह्याच्या प्रतीक्षेत आहेत. 


हे वाचा : प्रकल्पग्रस्त आक्रमक

ही व्यक्ती योजनेस पात्र 
लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. विवाहित जोडप्यांपैकी एक जण हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शीख आणि बौद्ध यापैकी असावी. 
योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून भरून द्यावा. अर्जासोबत विवाह नोंदणी दाखला, वधू-वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि वधू-वरांच्या जातीच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्‍यक आहे. आंतरजातीय विवाहाची नोंदणी संबंधित विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे झालेली असावा. वधूचे वय 18 वर्षे आणि वराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT