manish market 
मुंबई

बाजारपेठ उघडताच मोबाईलच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी; सुटे भाग नसल्यामुळे व्यापारी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील बाजारपेठा उघडल्यानंतर आज मोबाईल दुरुस्तीची छोटी दुकाने किंवा टपऱ्यांमध्ये लोकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र होलसेल मार्केटमध्ये अजूनही मोबाईल दुरुस्ती चे साहित्य परदेशातून येत असल्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे दोन-तीन आठवड्यानंतर कळेल असे एकंदर चित्र आहे.

आज बाजारपेठा सुरू झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अर्धी दुकाने उघडली होती. त्यात मोबाईल ही सध्याची जीवनावश्यक वस्तू झाल्यामुळे मोबाईलच्या खरेदीसाठी तसेच दुरुस्तीसाठी लोकांनी छोट्या दुकानात बाहेर चांगलीच गर्दी केली होती. अनेकांच्या मोबाइलचे स्क्रीन तुटले होते. अनेकांना बॅटरी बदलून हव्या होत्या. काहींचे इयरफोन फोन खराब झाले होते. मोबाईलच्या बटन मध्ये काही प्रॉब्लेम होते, असे सलीम शेख या गोरेगावच्या दुकानदाराने सांगितले.

मात्र अनेक ठिकाणी मोठ्या मॉलमधील व मोठ्या शॉपिंग सेंटर मध्ये मोबाईलचे दुकान उघडायला परवानगी मिळाली नसल्यामुळे ग्राहक नाराज झाल्याचे चित्र दिसून आले. मोबाइल दुरुस्ती चे सुटे भाग हे चीनमधून आयात होतात. सध्या हवाईमार्गे होणारी आयात संपूर्ण बंद असून जलमार्गे होणाऱ्या तुटपुंज्या आयातीवरच काम भागवावे लागत आहे. ही आयात अजूनही पूर्ण वेगाने सुरू झाली नाही. त्यामुळे सध्या आमच्याकडे असलेल्या साठ्यावरच कसेतरी काम भागवून द्यावे लागत आहे. एकदा का आमच्याकडे साठा संपला की किरकोळ दुकानदारांना त्याची टंचाई भासू लागेल, असे एका होलसेल विक्रेत्याने सांगितले. 

असलम मलकानी या होलसेल विक्रेत्यांचे मनीष मार्केटमध्ये मोबाईलच्या सुट्या भागांच्या विक्रीचे मोठे दुकान आहे. मात्र ते शॉपिंग सेंटर असल्यामुळे त्याला अद्याप उघडायला परवानगी मिळाली नाही. मात्र तरीही त्यांच्याकडे मोबाईल दुरुस्ती बाबत विचारणा करणारे किमान चाळीस-पन्नास दूरध्वनी रोज येत आहेत. लॉक डाऊन पूर्वीपासून काहींनी त्यांच्याकडे दिलेले मोबाईल अद्यापही दुरुस्ती न झाल्यामुळे तसेच पडले आहेत. चीनमधून अद्याप म्हणावी अशी आयात सुरू झाली नाही असेही मलकानी यांनी सकाळ'ला सांगितले. मात्र किरकोळ दुकानात मोबाईलच्या खरेदीसाठी तसेच दुरुस्तीसाठी गर्दी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

 मोबाईल ही सध्या अत्यावश्यक गोष्ट झाली असून करमणुकीसाठी तसेच कामासाठीही त्याचा मोठा वापर होतो. त्यामुळे सध्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात ग्राहक अगदी महागडे मोबाईल नाही तरी स्वस्तातले मोबाईल घेतच आहेत, असेही ते म्हणाले. सध्या अनेक दुकानांमधील नोकर तसेच दुकानांना माल पुरवणारे किरकोळ विक्रेते हे गावी निघून गेले आहेत, मदतनीसही कामावर येत नाहीत. 

सत्तर-ऐंशी दिवसांच्या लॉकडाऊन नंतर बाजारपेठा सुरू होऊन एक दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे आज बाजारात गर्दी दिसते आहे. मात्र एक दोन आठवड्यांनी आपल्याला नक्की परिस्थिति कळेल. मोठ्या खरेदीला लोकांचा प्रतिसाद कसा आहे, लॉकडाऊन मुळे नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचे नेमके किती नुकसान होणार आहे, हे आपल्याला नंतरच कळेल असेही मलकानी यांनी सांगितले.

people in mumbai make crowd at mobile stores read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Ambarnath Election: अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं; काँग्रेसला सोबत घेतलेल्या भाजपचं काय?

Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update : भाजपकडून २६ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

SCROLL FOR NEXT