संग्रहित
संग्रहित 
मुंबई

ठाणे जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांसाठी गोणपाटांची वानवा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या कामासाठी गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ५ हजार वनराई बंधारे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कामाला २ ऑक्‍टोबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या तेरा दिवसांत ३० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई भेडसावत असते. अशा वेळी वनराई बंधाऱ्यांत साठविलेले पाणी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कामाला येते. या वनराई बंधाऱ्याच्या पाण्यावर विविध भाजीपाला लागवड, कडधान्य तसेच रब्बी पिकांची लागवडही 
केली जाते.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पावसाचे पाणी वाहून जाते. येथील जमिनीत पाणी मुरत नसल्याने सरासरी पाऊस पडल्यावरही भूजल पातळीत वाढ होत नाही. त्यामुळेच जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, शहापूर आणि मुरबाड तालुक्‍यांना प्रत्येकी १ हजार ५००,  भिवंडी तालुक्‍यात १ हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्‍यांना प्रत्येकी ५०० बंधारे बांधले जाणार आहेत; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोण्याच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

तालुक्‍यांना बंधाऱ्यांचे लक्ष्यांक
जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर आदी पाच ग्रामीण तालुक्‍यांना बंधाऱ्यांचे लक्ष्यांक देण्यात आले आहेत. या लक्षांकानुसार पाचही तालुक्‍यांत ५ हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर या कामाला अधिक वेग येणार आहे. यामध्ये प्रशासनातील विविध यंत्रणा, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, स्थानिक शेतकरी, गावातील युवक, सेवाभावी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थांचा सहभाग घेतला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT