crime
crime  sakal media
मुंबई

अंबरनाथ: आर्थिक संकटाच्या भीतीमुळं दोन महिन्याच्या मुलीचा सौदा; पालकांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : कोरोनाच्या (corona) आर्थिक संकटात (Financial crisis) तिसऱ्या अपत्याचा  बोजा कुटुंबावर पडणार या भीतीने एका दाम्पत्याने त्यांच्या दोन महिन्याच्या मुलीचा सौदा केल्याचा (two months daughter selling crime) धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे.  शहरातील एका रिक्षाचालकाने दोन महिन्याच्या मुलीला नालासोपारा येथील एका दाम्पत्याला बेकायदा पद्धतीने दिले आहे. याप्रकरणी जिल्हा महिला आणि  बालविकास विभागाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल (Police complaint filed) करण्यात आला असून  अधिक तपास सुरू आहे.

दोन महिन्यांपूर्वी तिसरी मुलगी झाल्याने या मुलीचा शिक्षणाचा आणि लग्नापर्यंतचा खर्च कसा करायचा या विवंचनेत असलेल्या अंबरनाथमधील एका कुटुंबाचा संपर्क नालासोपारा येथील एका दाम्पत्याशी झाला. मुलीच्या आई- वडलांनी  १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावर दत्तक विधान करून दोन महिन्यांची मुलगी त्यांच्याकडे सोपवली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अंबरनाथ येथील शहरी बाल संरक्षण समितीच्या सदस्यांकडून अशा प्रकारे बाळाची विक्री झाल्याची माहिती मिळाली.  

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या आदेशानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पल्लवी जाधव आणि वन स्टॉप सेंटरच्या सिद्धी तेलंगे यांनी त्वरित अंबरनाथ पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांच्या मदतीने  संबंधित दाम्पत्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची  दोन महिन्यांची मुलगी नालासोपारा येथील दांपत्याला दिल्याचे त्यांनी कबूल केले. करोनाच्या काळात टाळेबंदीमुळे आर्थिक बेताची स्थिती निर्माण झाली आहे. मुलीचा सांभाळ, तिचे शिक्षण आणि लग्न करू शकणार नाही म्हणून ही मुलगी देण्याचे ठरवल्याचे या दोघांनी सांगितल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाच्या पल्लवी जाधव यांनी दिली आहे. 

या प्रकारानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बाळाला बालकल्याण समितीच्या आदेशानंतर जननी आशिष या विशेष दत्तक संस्थेत दाखल करण्यात आले आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत असून त्यातून यात आर्थिक व्यवहार झाला आहे का याचीही पडताळणी केली जाते आहे. बाळ दत्तक देणे- घेणे यासाठी  केंद्रीय दत्तक संसाधन (सीएआरए ) कायदेशीर प्रक्रिया आहे. या  प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरात केंद्रीकृत पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते.

तर नात्यातील दत्तक प्रक्रिया न्यायालयाच्या संमतीने केली जाते. या कायदेशीर प्रक्रिया न करता केलेले व्यवहार गुन्ह्यात ग्राह्य धरले  जातात. त्यामुळे या प्रक्रियांचा अवलंब न करण्याचे आवाहन आणि यातील समस्यांबाबत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे  आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT