रायगडवासीय अद्यापही अंधारातच; वीज कंपनीचे कर्मचारी दुर्गम भागात पोहचलेच नाही! 
मुंबई

रायगडवासीय अद्यापही अंधारातच; वीज कंपनीचे कर्मचारी दुर्गम भागात पोहचलेच नाही!

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळ शांत होऊन अर्धा महिना होऊन गेला तरीही माणगाव, श्रीवर्धन, मुरुड, रोहा, तळा आणि म्हसळा, अलिबाग या सर्वात जास्त प्रभावीत तालुक्यांमधील ग्रामीण भाग अद्यापही अंधारातच आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकही तितकेच उत्स्फुर्तपणे सहकार्य करीत असले तरी वीज कंपनीचे अभियंते दुर्गम भागात पोहचलेलेच नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.


पावसाच्या व्यत्ययामुळे हे काम वाढतच चालले आहे. त्यामुळे अंधारात असलेला दुर्गम भाग प्रकाशात आणण्यासाठी किमान पंधरा दिवस लागतील, असा अंदाज महावितरण कंपनीचा आहे. वाकलेले पोल बाजूला करुन नवे पोल टाकण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. यासाठी येथील सामाजिक संस्था, ग्रामस्थ स्वयंस्पुर्तीने सहकार्य करीत आहेत. आता औरंगाबाद, अकोला येथीलही महावितरणचे अभियंते रायगडमध्ये दाखल झालेले आहेत. पोल टाकणे आणि तारा खेचण्यासाठी जेसीबी, क्रेनचा वापर केला आहे. त्याचबरोबर कमकुवत झालेली झाडे तात्काळ काढली जात आहेत. यासाठी लागणारी मनुष्यबळाची कमतरता ग्रामस्थ भरुन काढत आहेत; परंतु झालेले नुकसानच मोठ्या प्रमाणात असल्याने प्रभावित तालुक्यांमधील महत्वाच्या शहरांमधीलच वीज सुरु झाली आहे. तर ग्रामिण भागात पोल टाकण्याचेच काम संपलेले नाही. अद्यापही शहरीभाग वगळून श्रीर्वर्धन तालुका नव्वद टक्के, रोहा-मुरुड तालुके साठ टक्के, तळा-माणगाव तालुका सत्तर टक्के अंधारात आहे. दुरुस्तीच्या कामात सुरु होणाऱ्या  पावसामुळेही व्यत्यत येत आहे. मागील दहा दिवसात या भागात 27 मिमी सरासरीने पाऊस पडला. यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरुन लोखंडी पोल, अवजड यंत्रसामग्री पोहचवणे कठीण जात आहे. 

अभियंत्यांचे दिवसरात्र काम सुरु आहे. वीज पुरवठा सुरु करण्याची जबाबदारी फिडरनुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम अधिक गतीने होईल आणि कोणताही भाग दुर्लक्षीत राहणार नाही. अभियंत्यांना येथील नागरिकांचेही तितकेच चांगले सहकार्य मिळत असले तरी यावर पावसाचाही परिणाम दिसून येत आहे.
- ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण (भांडुप विभाग)

ग्रामीण भाग दुर्लक्षीत राहिलेला आहे. येथे वीज कंपनीचे कर्मचारी पोहचतच नाहीत. माणगाव तालुक्यातील भागाड बौध्दवाडी येथील लोकांनी स्वतः पैसे काढून पडलेले पोल उभे केले आहेत. गावातील समाजसेवक संजय गुळणबे यांनी स्वतःच्या गाड्या दिल्या व पोल पोहचवले. खडी, रेती, सिमेंट स्वतः आणले. सर्व सामान आणून दिल्यानंतरही हे काम पुर्ण झाले नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात अनेक गावे आहेत. या गावांकडे लक्ष द्यावे, अन्यथा रिपब्लिकन सेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.
- रमेश जाधव, कामगार नेते, मुंबई प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT