Raj and Uddhav thackeray 
मुंबई

अधिवेशनाच्या मुद्द्यावरून 'मनसे'चा ठाकरे सरकारला सणसणीत टोला

विराज भागवत

पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचेच असल्याची सरकारची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राच्या सरकारने यंदाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) हे केवळ २ दिवसांचेच असल्याचे जाहीर केले. ५ आणि ६ जुलैला पावसाळी अधिवेशन होईल असं सांगण्यात आले. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी तीव्र नाराजी (Angry) व्यक्त केली. 'एकीकडे राज्यातील विविध समाज आरक्षण (Reservation) आणि इतर प्रश्नांवर विशेष अधिवेशनाची मागणी करत असताना दुसरीकडे असलेले अधिवेशनच कमीत कमी कसे होईल याकडे सरकारचा कल आहे', अशी टीका भाजपने (BJP) केली. त्यानंतर मनसेचे (MNS) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारची खिल्ली उडवली. (Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande trolls CM Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Govt)

शाळेत जाणारी मुलं ज्याप्रमाणे परिक्षा जवळ आली आणि अभ्यास झालेला नसेल तर परिक्षेला न जाण्यासाठी विविध बहाणे बनवतात. त्याचप्रकारे हे सरकारदेखील लोकांचे प्रश्न सोडवत नसल्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जायला घाबरते, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. "लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतं, नाही तर मग डोकं दुखतं. तस काहीसं महाविकास आघाडी सरकारचं झालं आहे. लोकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे अधिवेशनच नको", अशा शब्दात देशपांडे यांनी सरकारची खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले...

"कोरोनाचा आजार अत्यंत गंभीर आहे यात दुमत नाही. पण कोरोनाचा बहाणा पुढे करून राज्याचे अधिवेशनच होऊ नये, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. एकीकडे सरकारमधील एका पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कितीही लोकं गेलेली चालतात, राज्यातील बारमध्ये कितीही लोक जाऊन बसलेली चालता... पण राज्याच्या विधीमंडळात कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही, अशी मानसिकता या सरकारची आहे. केवळ २ दिवसांचे अधिवेशन घेण्याची सरकारची तयारी आहे आणि आम्हाला हे मान्य नाही", अशा शब्दांत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली.

प्रवीण दरेकर म्हणाले...

"जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी तसेच लोकशाही मार्गाने ह्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन हे एक माध्यम आहे! परंतु केवळ २ दिवसांचे अधिवेशन घेऊन औपचारिकता करण्याच्या तयारीत असलेल्या राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती वाटतेय का?", असा सवाल राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT