मुंबई

बापरे! कोरोनाच्या औषधाबाबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; तब्बल ५ दिवस..

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई: मुंबईत आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल ७५ हजारांच्या पार पोहोचला आहे. वैज्ञानिक कोरोनावर लस तयार व्हावी म्हणून दिवस रात्र मेहनत करत आहेत. मात्र मुंबईत कोरोनाच्या औषधाबाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

कोरोनावर औषध असलेल्या रेमडीसीवीर आणि फॅवीपिरावीर यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल गेली पाच दिवस मुंबईच्या एअर कार्गोत अडकून पडला  असल्याची माहिती मिळतेय. एका खासगी वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. मायलन या फार्मास्युटिकल्स कंपनीकडून आयात करण्यात आलेला माल मुंबईतच अडकून पडला आहे. 

राज्य सरकारने ही दोन्ही औषधं कोव्हिडवरील उपचारासाठी मागवून घेऊ असं म्हटलं होतं. भारतात हेट्रो ड्रग्ज आणि सिप्ला या दोन कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्याची आणि विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल गेल्या ५ दिवसांपासून मुंबईच्या एअर कार्गोत अडकून पडल्याने आता हे औषधं कधी तयार होतात यावर संभ्रम निर्माण झाला आहे. 

राज्यात तब्बल एक लाखांच्यावर कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. दिवसेंदिवस मृतांची संख्याही वाढत चालली आहे. रुग्णांना लवकरात लवकर औषधं पुरवली जातील असं सरकारनं सांगितलं होतं. मात्र तब्बल ५ दिवस हा कच्चा माल मुंबईतच पडून असल्याची माहिती आता समोर येतेय. त्यामुळे  ही औषधं तयार होण्यात विलंब होण्याची शक्यता आहे.  

raw material of corona medicine is in mumbai from last 5 days 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT