mortal remains 
मुंबई

'तो' मृतदेह आमच्याच नातेवाईकाचा होता का?..बेपत्ता कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांचा सवाल.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाण्यातील बाळकुम येथील कोविड रुग्णालयातून भालचंद्र गायकवाड (वय 72) हे कोविड रुग्ण बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गायकवाड यांच्या नातेवाईकांना अशी माहिती देण्यात आली की तुमच्या रुग्णाचे 3 जुलैला निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहे. 

परंतू भालचंद्र यांच्यावरच अंतिम संस्कार झाले आहेत, की दुसरेच कोणी होते ते, जसे बाबा बेपत्ता झाले त्याविषयी कोणाला माहिती नाही तसेच मृत पावलेली व्यक्ती बाबाच होती कशावरुन असे अनेक प्रश्न आज गायकवाड कुटूंबियाला भेडसावत आहेत. परंतू प्रशासनावर विश्वास ठेवण्यापलीकडे आता आमच्या हातात काहीही राहीलेले नाही अशी आगतिकता कुटूंबियातील व्यक्ती व्यक्त करीत आहेत. 

बाळकुम येथील कोविड रुग्णालयातून भालचंद्र गायकवाड हे बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवारी रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर बेपत्ता रुग्णाचा 48 तासात शोध घेतला जाईल असे आश्वासन प्रशासन स्तरावरुन भाजपच्या नेत्यांना देण्यात आले होते. मंगळवारी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्या डॉ. चेतना दिक्षित व गायकवाड कुटूंबियांना कापुरबावडी पोलिस ठाण्यातून संपर्क साधण्यात आला. 

त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून भालचंद्र गायकवाड यांचे निधन 3 जुलैला झाले असून रुग्णालय प्रशासनाची चूक झाल्यामुळे सोनावणे कुटूंबियांना सोनावणे यांचे निधन झाल्याचे सांगून भालचंद्र यांचा मृतदेह सोपविण्यात आला. व त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती देण्याच आल्याचे दिक्षित यांनी सांगितले. झाला प्रकार अत्यंत वाईट असून बेपत्ता रुग्णाच्या कुटूंबियांना याचा प्रचंड त्रास झाला आहे.

याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मतदाता जागरण अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच रुग्णांचे जिओ टॅगिंग व्हावे जेणेकरुन नातेवाईकांना किंवा रुग्णालय प्रशासनाला ते समजेल की रुग्ण कोठे आहे. तसेच पारदर्शक बॉडीबॅग वापरण्यात याव्यात जेणेकरुन नातेवाईकांना आपल्या व्यक्तीचा चेहराही पाहता येईल व इतर कोणत्याही नातेवाईकांसोबत अशी घटना पुढे घडणार नाही असेही दिक्षित यांनी सांगितले. 

याप्रकरणी भालचंद्र गायकवाड यांची सून रेणूका यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आम्हाला केवळ कळविण्यात आले आहे की 3 जुलैला भालचंद्र गायकवाड यांचे निधन झाले आहे. याविषयी चुकून सोनावणे कुटूंबियांना त्यांचा रुग्ण निधन पावल्याचे सांगून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. व त्यांच्यावर अंतिम संस्कारही करण्यात आले आहेत. परंतू सोनावणे कुटूंबियांना दिला गेलेला मृतदेह हा भालचंद्र यांचाच होता याविषयी खात्रीलायक माहिती काय? त्यासाठी आम्ही सीसीटिव्ही फुटेज दाखवावे अशी विनंती केली परंतू अतिदक्षता विभागात सीसीटिव्ही नसतात असे आम्हाला सांगण्यात आले. आता आमच्याकडे काहीही पर्याय नसून ते सांगतिल त्यावर विश्वास ठेवावा लागेल. 

परंतू ही घटना दुसऱ्या कोणत्या कुटूंबसोबत होऊ नये यासाठी आम्ही आवाज उठविणार आहोत असेही रेणूका यांनी सांगितले. याविषयी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.

relatives asking questions over corona patients who is missing from thane 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT