मुंबई

ज्येष्ठ नागरिकांच्या क्वांरटाइन संदर्भात मोठी अपडेट, पालिकेनं बदलला नियम

पूजा विचारे

मुंबईः  गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून कोरोना व्हायरस मुंबईत तळं ठोकून आहे. गेल्या महिन्यापासून मुंबई शहर कोरोनासारख्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई शहरात आढळून आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अजूनही विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.  पालिकेनं कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईनच्या नियमावलीत मोठा बदल केला आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. मुंबईत सुरुवातीपासून वयोवृद्ध रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे २१ ऑगस्टला वयोवृद्ध रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णांवर पालिका रुग्णालयातच उपचार केले जातील, असं स्पष्ट केलं होतं. 

मात्र,  मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये खाट मिळत नाहीत तर पालिका आणि कोविड केंद्रांमध्ये उपचार करून घेण्यास बहुसंख्य नागरिक तयार होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे पालिकेनं आपल्या निर्णयात बदल करत वयोवृद्ध रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पालिकेच्या नव्या निर्णयानुसार, आता वयोवृद्ध रुग्णांना घरातच क्वारंटाइन केले जाणारेय. दरम्यान घरातूनच उपचारांचा फॉलोअप घेतला जाईल. स्थिती गंभीर असेल किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल, तरच त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. 

मुंबईतला रुग्णवाढीच्या दरात वाढ

मंगळवारी मुंबईत वाढलेला रुग्णांचा आकडा दोन हजारच्या खाली आला. मंगळवारी  दिवसभरात 1,585 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,73,534 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.24 वरून वाढून 1.28 टक्क्यांवर  गेला आहे. मुंबईत काल दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,227 वर पोहोचला आहे. मुंबईत मंगळवारी 1,717 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.

मुंबईत मंगळवारी नोंद झालेल्या 49 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. मंगळवारी एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 36 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षाखालील होते.  33 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते. तर 14 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते. 

मंगळवारी 1,717 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,34,066 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 54 दिवसांवर गेला आहे. 14 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,36,574  कोविड चाचण्या करण्यात आल्या.  8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.28 वर स्थिर आहे.

Senior citizens quarantined at home decision taken Mumbai Municipal Corporation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT