जागतिक अस्थिरतेमुळे सेन्सेक्‍सची 600 अंशांनी गटांगळी!
जागतिक अस्थिरतेमुळे सेन्सेक्‍सची 600 अंशांनी गटांगळी! 
मुंबई

जागतिक अस्थिरतेमुळे सेन्सेक्‍सची 600 अंशांनी गटांगळी!

कृष्ण जोशी

मुंबई : जागतिक अस्थिर परिस्थितीमुळे बुधवारी (ता.28) भारतीय शेअर बाजारांमध्ये सुमारे दीड टक्के घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 599.46 अंशांनी घसरून 39,922.46 अंशांवर स्थिरावला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159.80 अंशांनी घसरून 11,729.60 अंशांवर बंद झाला. 

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अनिश्‍चितता, तसेच युरोप अमेरिकेतील कोविड रुग्णांची वाढती संख्या, यामुळे सर्वच शेअर बाजारांमध्ये अस्थिर वातावरण आहे. त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारांमध्ये उमटून बॅंका व आर्थिक संस्था, औषध कंपन्या, तसेच धातू आणि आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री झाली. निफ्टीमधील प्रमुख 50 कंपन्यांपैकी केवळ नऊ कंपन्यांचे समभाग वाढ दर्शवीत बंद झाले.

सेन्सेक्‍समधील 30 प्रमुख कंपन्यांपैकी भारती एअरटेल सव्वाचार टक्के वाढीसह 451 रुपयांवर बंद झाला. एअरटेलमधील परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढविल्याच्या बातमीने गुंतवणूकदारांनी या समभागांची खरेदी केली; तर महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती व लार्सन टुब्रो हे समभाग देखील किरकोळ वाढ दाखवीत बंद झाले. इंडसइंड बॅंक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक व टेक महिंद्र यांच्यात तीन टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त घसरण झाली. बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, टाटा स्टील, एचसीएल टेक व स्टेट बॅंक यांच्या दरातही दोन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पडझड झाली. 
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT