मुंबई

'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगत चाललंय. फडणवीस यांच्या बांगड्यांचा संदर्भ देत करण्यात येणारं विधान, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेलं ट्विट आणि यावर आलेली अमृता फडणवीस यांची 'रेशीम किडा' ही प्रतिक्रिया. यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं. यावर आता मनीषा कायंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरेंनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत" असा खोचक टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी लगावलाय. 

काही दिवसांपूर्वी भाजपच्या आंदोलनादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी " 'शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील' असा संदर्भ असलेलं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना "सर्वाधिक शक्तिशाली असलेल्या महिला बांगड्या घालतात. ते कुठल्याही कमकुवतपणाचं लक्षण नाही. त्यामुळे फडणवीसांनी आपली मानसिकता बदलावी आणि आपल्या विधानाबद्दल माफी मागावी", असं म्हंटलं होतं. मात्र त्यानंतर अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. 

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस:
 
"काही रेशमी किडे आयुष्यातील उपहास कधीच समजू शकणार नाहीत, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखी रेशमी आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते,' असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र त्यावर आता मनीषा कायंदे यांनी टोला लगावलाय. 

शिवसेनेचं प्रत्युत्तर: 

"प्रबोधनकार ठाकरे, माननिय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेले श्री. आदित्य ठाकरे आहेत. त्यांचे वडील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा छंद जोपासला आहे. " असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी म्हंटलंय. 

त्यामुळे आता या टिकेला अमृता फडणवीस यांच्याकडून काही प्रत्युत्तर येणार का हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

Shivsena replies to tweet of amruta fadanvis 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT