मुंबई

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद 

तेजस वाघमारे

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर झाल्यानंतर दहावी बारावी परीक्षा रद्द होणार, असे समज सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. परीक्षेची तयारी करण्यात विद्यार्थांचा बहुमूल्य वेळ खर्ची पडत आहे. या पद्धतीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल सुचविण्यात आले आहेत. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. या धोरणामध्ये दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थांना वर्षातून दोन वेळ परीक्षेची संधी देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थांवर परीक्षेचा सध्या असलेला तणाव कमी होणार आहे. नवीन धोरणानुसार दहावी बारावी बोर्डच्या परीक्षा सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विद्यार्थांना परीक्षेचे विषय निवडता येणार आहेत. त्याचप्रमाणे बोर्ड परीक्षेचे स्वरूपही बदलण्यात येणार आहे. त्यामुळे निवडलेल्या विषयात विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकेल असे बदल करण्यात येणार आहेत.

विद्यार्थांना अंतिम परीक्षा वर्षातून दोन वेळा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक मुख्य परीक्षा आणि काही कारणामुळे परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थांसाठी एक परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा पद्धतीबाबत बोर्ड एक मॉडेल विकसित करू शकणार आहे. त्यानुसार वार्षिक, सेमिस्टर, मॉड्युलर पद्धतीचा अवलंब करता येणार आहे. ही पद्धती निर्माण करताना विद्यार्थांना परीक्षेची भिती वाटेल, अशी परीक्षा पद्धत नसावी, असेही धोरणात म्हटले आहे. काही विषयांसाठी बोर्ड दोन भागात परीक्षा घेऊ शकते. एकामध्ये पर्यायी आणि दुसर्यामध्ये वर्णनात्मक प्रश्न ठेवता येतील, असेही धोरणात म्हंटले आहे.

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

तिसरी, पाचवी आणि आठवीची परीक्षा प्राधिकरण घेणार
शालेय शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सर्व विद्यार्थांना नियोजित प्राधिकारणामार्फत आयोजित होणाऱ्या तिसरी, पाचवी आणि आठवी मध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. घोकंपट्टी ऐवजी वास्तविक जीवनावर आधारित ही परीक्षा असेल. तिसरीची परीक्षा साक्षरता, संख्या ज्ञान आणि मूलभूत कौशल्यावर आधारित असणार आहे.     
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Mayor: नवी मुंबई सत्तेसाठी भाजप-सेना आमनेसामने! महापौर कोण होणार? निवडणुकीच्या तारखेसह 'या' 2 नेत्यांची नावे समोर

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Viral : चार वर्षांच्या मुलाला शेतात खेळताना सापडला ४०० वर्षांपुर्वीचा खजिना, किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

Latest Marathi News Live Update: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदावरून काँग्रेसच्या दोन गटात वाद

भांडणं, प्रेम, ते विजेता... 'बिग बॉस मराठी' मध्ये सगळं आधीच ठरलेलं असतं का? अखेर सत्य समोर आलंच

SCROLL FOR NEXT