मुंबई

मोठी बातमी - मुंबई, पुण्यातील फेरीवाल्यांबद्दल स्पष्ट केली भूमिका, सरकार म्हणतंय....

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक व्यावसायिकांना आपापले व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरु करण्यास सरकार सशर्त परवानगी देतंय. ज्याप्रकारे लॉकडाऊनमुळे व्यवसायिकांचं मोठं नुकसान झालंय, त्याचप्रमाणे फेरीवाल्यांचं देखील कोरोना लॉकडाऊनमुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. फेरीवाल्यांची उपजीविका त्यांच्या रोजच्या कामावर सुरु असते. या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने सरकारला फेरीवाल्यांबाबत विचार करून त्यांनाही परवानगी द्यावी अशी विनंती करण्याची मागणी केली  होती. 

मनोज ओस्वाल यांनी ऍडव्होकेट आशिष वर्मा यांच्यामार्फत ही मागणी केली होती. मुंबई हायकोर्टाने, "नियम शिथिल करत असताना फेरीवाल्यांचा देखील विचार करून त्यांना सशर्त परवानगी द्यावी. फेरीवाल्यांना परवानगी दिल्याने त्यांचं जीवन सुसह्य होईल", असं हायकोर्टाने सरकारला सांगावं अशी अशी विनंती करण्यात आली होती. यावर राज्य सरकारने स्पस्ट नकार दिलाय. 

राज्य सरकारची काय आहे भूमिका ? 

"फेरीवाल्यांना परवानगी दिल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावु शकतो. त्यामुळे फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायास परवानगी देण्याचा सरकारचा विचार नाही", अशी राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. फेरीवाल्यांविषयीच्या धोरणाबद्दल हायकोर्टाने  २० जून रोजी सरकारला विचारणा केली होती. यावर राज्य सरकारकडून उत्तर देण्यात आलंय. 

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. 

state government clarifies their stand regarding action plan to give permission to hawkers 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT