मुंबई

मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर जोरदार कारवाई, आतापर्यंत गोळा केला 'इतक्या' रुपयांचा दंड

समीर सुर्वे

मुंबई: मास्क न वापरणाऱ्या 2 हजार 798 लोकांकडून महानगर पालिकेनं तब्बल 27 लाख 48 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांकडून महानगर पालिका 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करत आहे. सुमारे दहा हजार नागरिकांना तंबी देऊन सोडण्यात आले आहे. पश्‍चिम उपनगरातून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला असून अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम प्रभागातून सर्वाधिक 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मरीन लाईन्स, गिरगाव परिसरातून 4 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारनं 9 एप्रिल पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र,आजही अनेक जण मास्क न वापरता फिरत असतात. अशाकडून 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जात आहे. पालिकेनं 9 एप्रिल ते 31 ऑगस्टपर्यंत 27 लाख 47 हजारांचा दंड वसूल केला आहे.  कांदिवली आर दक्षिण प्रभागातून 4 लाख 21 हजार आणि मरिन लाईन्स, गिरगाव सी प्रभागातून 4 लाख 8 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

सर्वाधिक दंड हा मे महिन्यात वसूल करण्यात आला. या महिन्यात तब्बल 9 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 953 लोकांकडून हा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर जुन महिन्यात 589 लोकांकडून 5 लाख 88 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात 523 लोकांकडून 4 लाख 82 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. याच काळात मुंबईत कोविडचा संसर्गाचा वेग वाढू लागला होता. वारंवार होणाऱ्या कारवाईमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती होऊन मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले.तसेच,नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावे असे आवाहन महापालिकेनं केलं आहे. 

Strict action against not wear masks in Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT