मुंबई

सुशांतसिंहला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील; बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

तुषार सोनवणे

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण राजकीय मुद्दा झाला की काय असा प्रश्न सध्या पडला आहे. सुशांतसिंहचा मुद्दा आगामी बिहार निवडणूकांमध्ये गाजणार हे स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष हा मुद्दा निवडणूकीचा मुद्दा केला आहे. आज बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सुशांतसिंह मृत्यू बाबत महत्वाचे विधान केले आहे.

फडणवीस म्हणाले की, सर्वसामान्य बिहारी जनतेची भावना स्पष्ट दिसत आहे की, सुशांतसिंहला न्याय मिळायला हवा.यासाठी आम्ही म्हणत आहोत की, ना भूलेंगे ना भुलने देंगे. आम्हाला असं वाटतं की निवडणूकीचा मुद्दा नाही परंतु सुशांत बिहारचा बेटा आहे. त्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

दरम्यान, फडणवीस यांनी कंगनाच्याही प्रश्नावर बोलताना म्हटले की, कंगनाने मुंबईचा पीओके बाबत केलेला उल्लेख हा योग्य नाहीच. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशभरातून नागरिक मुंबईत आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी येत असतात. त्यामुळे कंगनाने केलेली तूलना निषेधार्हच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT