मुंबई : आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित दोन महत्वाच्या कार्यकर्त्यांना कोविड काळातील रुग्णव्यवस्थापनासंदर्भात अटक केली आहे. या कारवाईनंतर निकराच्या लढाईला प्रारंभ झाल्याचे मानले जाते आहे.
ठाकरे गटाने सक्रीय होणे गरजेचे झाले आहे असे निरोप मंगळवारी रात्रीच कार्यकर्त्यांना पाठवल्याचे समजते. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी कारवाई केली होती. यात संजय राऊत यांच्या निकटवर्तींयांना अटक करण्यात आली होती.
कागदांची फेरफार करुन कंत्राट मिळवल्याचा आरोप या दोघांवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासंदर्भात अत्यंत आक्रमक धोरण स्वीकारले आहे. आगामी काळात हे धोरण अधिकच धारदार होण्याचे संकेत आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मंगळवारी रात्री कार्यकर्त्यांसाठी निरोप पाठवला. निकराच्या लढाईला प्रारंभ झाला असून आता सक्रीय होणे गरजेचे आहे, असे यात म्हटल्याचे समजते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.