मुंबई

ठाणे पालिकेच्या तिजोरीत अवघे 16 कोटी

सकाळ वृत्तसेवा

ठाणेकर करदात्यांनी कराचा भरणा करण्यासही विलंब केला आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला.

ठाणे: कोरोना काळात ठाणे पालिकेच्या तिजोरीत अवघे 16 कोटी शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे पालिकेला केवळ मालमत्ता आणि पाणी करातून अपेक्षित उत्पन्न मिळत आहे. परंतु पालिकेकडून देण्यात आलेल्या सवलतींमुळे जून ते जुलै अखेर पर्यंत उत्पन्न मिळाले होते. ठाणेकर करदात्यांनी कराचा भरणा करण्यासही विलंब केला आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला.

पालिकेच्या तिजोरीत सर्व खर्च करुन सध्याच्या घडीला केवळ १६ कोटींचाच निधी शिल्लक आहे. अत्यावश्यक सेवेतील पगार आणि डायघर वीज प्रकल्पासाठी तातडीचा आठ कोटींचा खर्च करण्यात आल्याने पालिकेवर १७ कोटींचा बोजा पडला. त्यात पालिकेच्या तिजोरीत निधी कमी झाल्याने मागील गुरुवारपासून नवी देयके घेण्यासह जुनी बिले अदा करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ठाणे पालिकेने काही प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून ३०० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यापैकी आतापर्यंत 136 कोटींचे कर्जाचे पैसे अदा करण्यात आले असून त्यातील 164 कोटींची देणी अद्यापही देण्याचे शिल्लक आहे. त्यानुसार याचा वार्षिक हप्ता 36 कोटींचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

Lasalgaon News : लासलगावमध्ये नायलॉन मांजाचा कहर; युवकाच्या तोंडाला २१ टाके

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT