मुंबई

मियावकीच्या जंगलाला अवकळा

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः नेरूळ येथे तयार केलेल्या बहुचर्चित मियावकी उद्यानातील झाडांना उन्हाच्या झळांपासून वाचवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. अनेक दिवसांपासून या वृक्षांना पाणीपुरवठा होत नसल्याने शेकडो झाडे सुकली आहेत. त्यामुळे मियावकी जंगल पाहण्यासाठी नेरूळ येथील ज्वेल्स ऑफला नवी मुंबईला भेट देणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरात जास्तीत जास्त घनदाट जंगले निर्माण करणे, अधिकाधिक परिसरात हरित पट्टे तयार करणे यासाठी नवी मुंबई महापालिकेने दंड थोपटले आहेत. त्याकरिता स्वयंसेवी संस्थांची मदत महापालिकेतर्फे घेतली जात आहे. शहरात लाखो झाडे लावल्याचा दावा अनेकदा महापालिकेकडून केला जात आहे. दरवर्षी जून महिन्यात पाऊस पडायला सुरुवात झाली, की वृक्षारोपणाचे दिमाखदार कार्यक्रमही सुरू होतात, परंतु एकदा झाडे लावून झाली, की त्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरवली जाते. याची प्रचीती नवी मुंबई शहरात येत आहे. नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या उद्यानात महापालिकेने लाखो झाडे लावली आहेत. एका पर्यावरणवादी संस्थेच्या मदतीने आणि सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वाखाली खासगी कंपन्यांकडून अर्थसाह्य घेऊन ही झाडे लावून जगवल्याचा दावा पालिकेतर्फे केला जात आहे; मात्र काही दिवसांपासून याच ठिकाणी लावलेल्या मियावकी जंगलातील शेकडो झाडे सुकून गेली आहेत. त्यामुळे उद्यानाच्या सुरुवातीला एका बाजूला नारळासारखी दिसणारी ही शोभेची हिरवीगार झाडे सुकून गेली आहेत. या झाडांना उन्हाच्या झळा बसत असून पाणीपुरवठा झाला नसल्याने सुकल्याचा अंदाज पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच घनदाट जंगले निर्माण करणारी ही जपानी मियावकी तंत्रज्ञानानुसार लावलेली झाडे जर सुकून जात असतील, तर या वर्षी लावण्यात येणाऱ्या झाडांचे काय होणार, असा प्रश्न पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित होत आहे.
----------------------------------
झाडांसाठी पालिकेचा वारेमाप खर्च
बेलापूर सेक्टर २९ येथील उड्डाणपुलावरील दुभाजकांवर महापालिकेने शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांना पाणी देऊन जगवण्यावर पालिकेतर्फे पैसे खर्च केले जातात. एका टँकरमार्फत झाडांना पाणी देऊन हिरवीगार ठेवली जात असतात; मात्र पाण्याचा टँकर या भागात येत नसल्याचे झाडांच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. येथील दुभाजकावरील लावण्यात आलेली झाडे सुकून गेल्याने पालिकेचा खर्च नक्की कुठे जात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
----------------------------------
झाडांचे संवर्धन करणे हे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे काम आहे; मात्र यात कामचुकारपणा दिसून येत आहे. कंत्राटदारांकडून झाडांना पाणीपुरवठा देण्यास दिरंगाई झाल्यामुळे झाडे सुकण्याचे प्रकार घडत आहेत. अशांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करायला हवी.
- आबा रणवरे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ
----------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT