डहाणू, ता. ४ (बातमीदार) : वाढवण समुद्रकिनाऱ्यापासून १० सागरी मैल अंतरावर सर्वेक्षण नौकेला (टग) जलसमाधी मिळून खलाशी बेपत्ता झाला, तर पाच खलाशी बचावले होते. या घटनेला आता २४ दिवसांचा काळ लोटला तरी त्याचा मृतदेह सापडला नाही.
मुंबईच्या दारूखाना भागातून अमृत १६ ही नौका वाढवण समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे १० सागरी मैल अंतरावर वाढवण बंदरासाठी जिओ टेक्निकल सर्वेक्षणासाठी आली होती. १२ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजण्याच्या सुमारास नौकेत पाणी शिरले. तेथील पाण्याच्या प्रवाहामुळे नौका बुडू लागताच नौकेत असणाऱ्या सहा खलाशांपैकी पाच जणांनी जवळच असणाऱ्या अन्नपूर्णा या दुसऱ्या नौकेला मदतीसाठी पाचारण केले. त्यांनी पाच जणांना नौकेवर सुखरूपपणे घेतले, मात्र राहुल कुमार यादव (वय २४) हा बेपत्ता झाला. त्याचा तटरक्षक दलाने अनेक तऱ्हेने शोध घेतला, मात्र त्याचा मृतदेह अद्याप मिळू शकला नाही. जाणकारांच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी अतिशय तीव्र समुद्रप्रवाह होता. या प्रवाहामुळे टग उलटा होऊन समुद्र तळाशी गेला असावा आणि त्यात मृतदेह अडकून पडल्यानेच मिळू शकला नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.