शिक्षित लोकचं करतात 'हे' कृत्य, त्यांनी व्यक्त केली खंत
शिक्षित लोकचं करतात 'हे' कृत्य, त्यांनी व्यक्त केली खंत 
मुंबई

शिक्षित लोकचं करतात 'हे' कृत्य, त्यांनी व्यक्त केली खंत

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : रस्त्यावरील 90 टक्के अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. यातील 99 टक्के वाहनचालक हे शिक्षित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शिक्षित असलेल्या वाहनचालकांकडूनच सर्वात जास्त वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे, अशी खंत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी नेरूळ येथे रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त केली. 

यावेळी सहपोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर, पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ-1चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे, पनवेलच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील उपस्थित होत्या. रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. या वर्षी 11 ते 17 जानेवारी या कालावधीत राज्यात 31 वा रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येत आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलच्या वतीनेदेखील सडक सुरक्षा, जीवन रक्षा हे ब्रीद घेऊन रस्ता सुरक्षा अभियान-2020 राबविण्यात येत आहे. शनिवारी (ता.11) सायंकाळी या अभियानाचे उद्घाटन नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रेक्षागृहात झाले. यावेळी आयुक्त संजय कुमार बोलत होते. 

वाहतूक नियमांचे पालन करावे 
रस्ता सुरक्षेकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. मात्र, रस्ता सुरक्षा ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नसून, ती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. पोलिसांकडून रस्ता सुरक्षेसंबंधी राबविण्यात येणारे उपक्रम हे त्यांच्यासाठी नाही, तर ते आपल्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अभिनेत्री जुही चावला यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT